शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

धान पट्ट्यातील भंडारा जिल्ह्याचा रबी पीक विम्यात यंदा पहिल्यांदाच समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही.

ठळक मुद्दे६३ शेतकऱ्यांनी काढला विमा : खरीपातील अनुभवाने शेतकऱ्यांची पाठ

  संताेष जाधवर    लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा यंदा पहिल्यांदाच रबी पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा काढला जातो. यंदाच्या खरीपात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र मोठे नुकसान होवूनही अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला. खरीपाचा अनुभव गाठीशी असल्याने रबी पीक विमा काढण्यास शेतकरी अनुस्तुक दिसत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम तिथी तीन दिवसावर असताना केवळ ६३ शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही. पदरमोड करून विमा हप्ता भरता तेवढेही पैसे परत मिळत नसतील तर विमा काढायचा तरी कशाला, असा सवाल केला जातो. पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

खरीप नुकसानीचे अनुदानभंडारा जिलह्यात अतिवृष्टी आणि महापुराने धान पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ६५४ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीत आणि महापूरात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे  शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विमा काढणार नाहीखरीप हंगामात मी धान पिकाचा विमा उतरविला होता. अतिवृष्टी आणि त्यानंतर तुडतुडा पिकाने प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी खरीप पीक विमा भरतो. मात्र मदत मिळत नसल्याने रबी पिकांचा पीक विमा उतरविणार नाही. तसेही रबीत नुकसान कमी होते. - सुरेश गिरेपुंजे, खरबी नाका.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा