शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

धान पट्ट्यातील भंडारा जिल्ह्याचा रबी पीक विम्यात यंदा पहिल्यांदाच समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही.

ठळक मुद्दे६३ शेतकऱ्यांनी काढला विमा : खरीपातील अनुभवाने शेतकऱ्यांची पाठ

  संताेष जाधवर    लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा यंदा पहिल्यांदाच रबी पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा काढला जातो. यंदाच्या खरीपात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र मोठे नुकसान होवूनही अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला. खरीपाचा अनुभव गाठीशी असल्याने रबी पीक विमा काढण्यास शेतकरी अनुस्तुक दिसत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम तिथी तीन दिवसावर असताना केवळ ६३ शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही. पदरमोड करून विमा हप्ता भरता तेवढेही पैसे परत मिळत नसतील तर विमा काढायचा तरी कशाला, असा सवाल केला जातो. पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

खरीप नुकसानीचे अनुदानभंडारा जिलह्यात अतिवृष्टी आणि महापुराने धान पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ६५४ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीत आणि महापूरात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे  शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विमा काढणार नाहीखरीप हंगामात मी धान पिकाचा विमा उतरविला होता. अतिवृष्टी आणि त्यानंतर तुडतुडा पिकाने प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी खरीप पीक विमा भरतो. मात्र मदत मिळत नसल्याने रबी पिकांचा पीक विमा उतरविणार नाही. तसेही रबीत नुकसान कमी होते. - सुरेश गिरेपुंजे, खरबी नाका.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा