शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'या' गावात रहस्यमय आगीचे थैमान, ४० वर्षांपासून सुरू आहे 'हा' प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 15:14 IST

गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते. परंतु, गुरुवारी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली.

ठळक मुद्देधानाचे पुंजने जळाले : शेतकरी भयभीत

भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली गावात रहस्यमय आगीने थैमान घातले असून गत ४० वर्षांपासून आगीचा प्रकार सुरू आहे. गुरुवारी शंकर बिसने यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाले आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरदोली गावात रहस्यमय आगीचा अनुभव गावकरी घेत आहेत. या गावात घरांना आग लागणे, घरातील कपडे जळाल्याचे प्रकार घडले आहेत. घरावर दगड कोसळल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय लगत असणाऱ्या कर्कापूर गावांतही रहस्यमय आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

गावकऱ्यांनी रहस्यमय आगीच्या घटनेवर अंकुश घालण्याचे प्रयत्न केले आहेत. यात त्यांना यश आले नाही. अनेक वर्षांपासून गावकरी व शेतकरी नुकसान सोसत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालकांना कधी शासन स्तरावरून भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे शासनाकडून गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची अपेक्षा सोडली आहे. गावात फक्त नुकसान सोसल्याशिवाय गावकऱ्यांना गत्यंतर नाही. मात्र, गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी बेफिकीर झाले होते व रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते.

दोन वर्षांच्या कालावधीत घर व धानाच्या पुंजन्यांना आग लागली नसल्याने गावकरी बिनधास्त होते. परंतु गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतकरी शंकर बिसने यांच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली. आग विझविण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुंजन्याला अचानक आग लागल्याने धानाची राख झाली आहे. आग लागल्याची चर्चा गावांत पसरताच नागरिक व शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. गावात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर अंकुश घालण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

गत ४० वर्षांपासून गावांत रहस्यमय आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या २ वर्षात या घटना थांबल्या होत्या. परंतु, गुरुवारी दुपारी पुन्हा एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजने जळाल्याने भीती निर्माण झाली आहे.

- नितीन गणवीर, सरपंच, हरदोली

या गावात आगीच्या घटनांत नुकसान झाल्याचा अनुभव गावकरी व शेतकऱ्यांना आहे. अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असून नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत घोषित झाली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

सतीश सोनेवाने, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीagricultureशेती