शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'या' गावात रहस्यमय आगीचे थैमान, ४० वर्षांपासून सुरू आहे 'हा' प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 15:14 IST

गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते. परंतु, गुरुवारी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली.

ठळक मुद्देधानाचे पुंजने जळाले : शेतकरी भयभीत

भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली गावात रहस्यमय आगीने थैमान घातले असून गत ४० वर्षांपासून आगीचा प्रकार सुरू आहे. गुरुवारी शंकर बिसने यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाले आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरदोली गावात रहस्यमय आगीचा अनुभव गावकरी घेत आहेत. या गावात घरांना आग लागणे, घरातील कपडे जळाल्याचे प्रकार घडले आहेत. घरावर दगड कोसळल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय लगत असणाऱ्या कर्कापूर गावांतही रहस्यमय आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

गावकऱ्यांनी रहस्यमय आगीच्या घटनेवर अंकुश घालण्याचे प्रयत्न केले आहेत. यात त्यांना यश आले नाही. अनेक वर्षांपासून गावकरी व शेतकरी नुकसान सोसत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालकांना कधी शासन स्तरावरून भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे शासनाकडून गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची अपेक्षा सोडली आहे. गावात फक्त नुकसान सोसल्याशिवाय गावकऱ्यांना गत्यंतर नाही. मात्र, गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी बेफिकीर झाले होते व रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते.

दोन वर्षांच्या कालावधीत घर व धानाच्या पुंजन्यांना आग लागली नसल्याने गावकरी बिनधास्त होते. परंतु गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतकरी शंकर बिसने यांच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली. आग विझविण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुंजन्याला अचानक आग लागल्याने धानाची राख झाली आहे. आग लागल्याची चर्चा गावांत पसरताच नागरिक व शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. गावात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर अंकुश घालण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

गत ४० वर्षांपासून गावांत रहस्यमय आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या २ वर्षात या घटना थांबल्या होत्या. परंतु, गुरुवारी दुपारी पुन्हा एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजने जळाल्याने भीती निर्माण झाली आहे.

- नितीन गणवीर, सरपंच, हरदोली

या गावात आगीच्या घटनांत नुकसान झाल्याचा अनुभव गावकरी व शेतकऱ्यांना आहे. अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असून नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत घोषित झाली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

सतीश सोनेवाने, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीagricultureशेती