शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:23 IST

येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा....

ठळक मुद्देदत्तात्रय मेंढेकर यांचे प्रतिपादन : अविरत २०१७ प्रशिक्षणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आपला दृष्टीकोन बदलावा, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडाराचे डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.२१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यांला प्रतिसाद देण्यासाठी, शिक्षकांच्या दृष्टीकोनात व कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाद्वारे एक महत्वाकांक्षी सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत २०१७ च्या दुसºया टप्प्याचे उद्घाटनआठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. अभय परिहार, तज्ज्ञ मार्गदर्शक नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील सहायक शिक्षक कैलास कुरंजेकर, जिजामाता विद्यालय भंडारा येथील मुख्याध्यापक शशीकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. मेंढेकर पुढे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकात जो उत्साह असतो तोच उत्साह सेवानिवृृत्त होईपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित शिक्षक हवाहवासा वाटावा, यासाठी शिक्षकाने जीव ओतून शिकवावे. शिक्षकांनी तणावमुक्त वातावरणात राहून आनंददायी शिक्षण द्यावे, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांकावर कसा येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. गोवर्धन भोंगाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांनी सतत वाचावे, आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रयत्न करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा दहा पटीने ज्ञानात पुढे असायला पाहिजे. डॉ. अभय परिहार म्हणाले, किशोरवयीन मुलांची वादळी अवस्था असते. त्यांच्या मनात संघर्षाची अवस्था निर्माण झाली असते. अशावेळी त्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी कसे वागावे याची जाणीव ठेवावी. राज्याचा के.आर. ए. वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. सर्वप्रथम दिवंगत सहायक शिक्षिका स्वाती घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन अर्चना बेदरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण वाडीभस्मे यांनी मानले. प्रशिक्षणात भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचा सहभाग आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी