शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षकांनी दृष्टिकोन बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:23 IST

येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा....

ठळक मुद्देदत्तात्रय मेंढेकर यांचे प्रतिपादन : अविरत २०१७ प्रशिक्षणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आपला दृष्टीकोन बदलावा, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडाराचे डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी केले.२१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा समजून त्यांला प्रतिसाद देण्यासाठी, शिक्षकांच्या दृष्टीकोनात व कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाद्वारे एक महत्वाकांक्षी सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत २०१७ च्या दुसºया टप्प्याचे उद्घाटनआठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. अभय परिहार, तज्ज्ञ मार्गदर्शक नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील सहायक शिक्षक कैलास कुरंजेकर, जिजामाता विद्यालय भंडारा येथील मुख्याध्यापक शशीकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. मेंढेकर पुढे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकात जो उत्साह असतो तोच उत्साह सेवानिवृृत्त होईपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित शिक्षक हवाहवासा वाटावा, यासाठी शिक्षकाने जीव ओतून शिकवावे. शिक्षकांनी तणावमुक्त वातावरणात राहून आनंददायी शिक्षण द्यावे, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांकावर कसा येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. गोवर्धन भोंगाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांनी सतत वाचावे, आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रयत्न करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा दहा पटीने ज्ञानात पुढे असायला पाहिजे. डॉ. अभय परिहार म्हणाले, किशोरवयीन मुलांची वादळी अवस्था असते. त्यांच्या मनात संघर्षाची अवस्था निर्माण झाली असते. अशावेळी त्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांनी कसे वागावे याची जाणीव ठेवावी. राज्याचा के.आर. ए. वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. सर्वप्रथम दिवंगत सहायक शिक्षिका स्वाती घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन अर्चना बेदरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण वाडीभस्मे यांनी मानले. प्रशिक्षणात भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचा सहभाग आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी