शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

गोवारी समाजाचा लढा कायमच

By admin | Updated: April 7, 2017 00:41 IST

मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.

मुलभूत सुविधांपासून वंचित : उदरनिर्वाहासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढलेआलेसूर : मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.मात्र स्वातंत्र्यप्राप्ती काळातही हा निसर्ग पुजक असलेला गोवारी समाज आजही मुलभूत गरजांसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आहे. जिल्ह्यात लोकसंख्या हजारोंच्या आकडेवारीत नमुद असून राजस्व अभिलेखात सर्वात जास्त अत्यल्प भूधारक भूमीहीन म्हणून नोंद आहे. सदर समाज आजही वडीलोपार्जीत पारंपारिकरित्या पशुपालन करीत असून कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी परराज्यात स्थलांतर करीत आहे. राज्यात २९,४२६६४ तर जिल्ह्यात २,६४६२४ यात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा व नवनिर्मित आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रात गोवारी समाजाचे प्रमाण अधिक आहे.गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून संघर्ष सुरु होता. यात राज्य व केंद्र शासनाने इतर मागास प्रवर्गात त्याचा समावेश करून दुधावरची तहान ताकावर भागविली. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाने नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात ११४ निष्पाप गोवारींचा बळी गेला. या चार दशकाच्या इतिहासात सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या काकासाहेब कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आयोगाने गोवारी जमात ही आदिवासी असल्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती. परंतु हे विधेयक येत असताना लोकसभा बरखास्त झाली. गोवारी समाजाच्या अनेक नेत्यांनी गोवारी ही आदिवासी जमात असल्याचे पुरावे दिल्यानंतर शासनाने या खऱ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. असा आरोप या जनतेने केले.वास्तविकरित्या आजही हा समाज सह्याद्री, सातपुडा, गोंडवन या डोंगरदऱ्या खोऱ्यात वास्तव्य करीत असून संगणकीकृत युगात अठराविश्वच्या दारिद्र्यात जीवन जगत आहे. शैक्षणिक क्रांतीस पिछेहाट असल्यामुळे पारंपारिकरित्या पशुपालन हाच मुळ व्यवसाय समजून काही काळासाठी चारापाण्याअभावी बिऱ्हाडासमवेत आंतरजिल्ह्यात स्थलांतर करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. शासनाचा अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कायदा अंतर्गत काही प्रमाणात वन जमिनी प्राप्त झाल्यामुळे स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)