शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोवारी समाजाचा लढा कायमच

By admin | Updated: April 7, 2017 00:41 IST

मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.

मुलभूत सुविधांपासून वंचित : उदरनिर्वाहासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढलेआलेसूर : मानवाला आधुनिक युगात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या पाच मुलभूत गरजांची आवश्यकता अधिक आहे.मात्र स्वातंत्र्यप्राप्ती काळातही हा निसर्ग पुजक असलेला गोवारी समाज आजही मुलभूत गरजांसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आहे. जिल्ह्यात लोकसंख्या हजारोंच्या आकडेवारीत नमुद असून राजस्व अभिलेखात सर्वात जास्त अत्यल्प भूधारक भूमीहीन म्हणून नोंद आहे. सदर समाज आजही वडीलोपार्जीत पारंपारिकरित्या पशुपालन करीत असून कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी परराज्यात स्थलांतर करीत आहे. राज्यात २९,४२६६४ तर जिल्ह्यात २,६४६२४ यात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा व नवनिर्मित आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रात गोवारी समाजाचे प्रमाण अधिक आहे.गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून संघर्ष सुरु होता. यात राज्य व केंद्र शासनाने इतर मागास प्रवर्गात त्याचा समावेश करून दुधावरची तहान ताकावर भागविली. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाने नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात ११४ निष्पाप गोवारींचा बळी गेला. या चार दशकाच्या इतिहासात सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या काकासाहेब कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आयोगाने गोवारी जमात ही आदिवासी असल्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती. परंतु हे विधेयक येत असताना लोकसभा बरखास्त झाली. गोवारी समाजाच्या अनेक नेत्यांनी गोवारी ही आदिवासी जमात असल्याचे पुरावे दिल्यानंतर शासनाने या खऱ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. असा आरोप या जनतेने केले.वास्तविकरित्या आजही हा समाज सह्याद्री, सातपुडा, गोंडवन या डोंगरदऱ्या खोऱ्यात वास्तव्य करीत असून संगणकीकृत युगात अठराविश्वच्या दारिद्र्यात जीवन जगत आहे. शैक्षणिक क्रांतीस पिछेहाट असल्यामुळे पारंपारिकरित्या पशुपालन हाच मुळ व्यवसाय समजून काही काळासाठी चारापाण्याअभावी बिऱ्हाडासमवेत आंतरजिल्ह्यात स्थलांतर करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. शासनाचा अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कायदा अंतर्गत काही प्रमाणात वन जमिनी प्राप्त झाल्यामुळे स्थलांतरणाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)