शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ढगाळ वातावरणाची शेतकऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खरीप हंगामात सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता धान विकताना पुन्हा ...

ठळक मुद्देजिल्ह्याच्या काही भागात बरसला पाऊस : आधारभूत केंद्रावरील धान झाकण्यासाठी उडाली तारांबळ

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता धान विकताना पुन्हा त्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावला आहे. आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.जिल्ह्यात गुरूवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, कोंढा, पालांदूर, लोहारा व जांब, कांंद्री, लाखांदूर, पवनी तालुक्यातील चौरास भाग, मोहदुरा यासह खरबी नाका परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या या ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले आहेत. खमारी येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या जिल्ह्यातील ७९ केंद्रावर आधारभूत धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत ७० ते ८० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर आणून तो बाहेर उघड्यावर ठेवला आहे. आता पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ताडपत्र्या झाकून धान वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काही शेतांमध्ये उच्च प्रतीच्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. या ढगाळ वातावरणामुळे कडपा ओला होत आहे. मजुराअभावी धान काढणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कडपा झाकून ठेवला आहे.यावर्षी शेतकऱ्यांना महापुरासह कीडींच्या प्रादूर्भावाचा सामना करावा लागला. संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांच्या घरी धान आला. त्यातही उतारा निम्म्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आता धान विकायला काढला तर पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटांचा सामना करीत असल्याचे दिसत आहे.

धान खरेदी केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीचे ७९ केंद्र सुरू झाले आहेत. परंतु याठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्याने धान मोजणीस विलंब होत आहे. केंद्रावर धानाची पोती उचलण्यासाठी हमाल अतिरिक्त दर घेत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्रावर मोजणीपर्यंतची जबाबदारी शेतकऱ्यांची आणि मोजणी झाल्यानंतरची जवाबदारी खरेदी केंद्र चालकांची असते. शेतकऱ्यांचा धान आणला त्यादिवशीच विकला गेला तर शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागणार नाही. परंतु शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते आणि सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना येथे दिसत नाही.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस