शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

विध्यार्थ्यांचा तुटलेल्या डोंग्यातून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 15, 2016 00:47 IST

पावसाळा सुरु झाला की तालुक्यातील नदी काठावर असलेल्या गावकरी व विध्यार्थ्यांचे हाल होतात. शाळेला सुटी नको, शिक्षणात अडथळा ...

व्यथा आवळीवासीयांची : प्रशासन लक्ष देणार का..? प्रमोद प्रधान लाखांदूर पावसाळा सुरु झाला की तालुक्यातील नदी काठावर असलेल्या गावकरी व विध्यार्थ्यांचे हाल होतात. शाळेला सुटी नको, शिक्षणात अडथळा थांबवण्याकरीता तसेच शेतीची कामे अगदी वेळेवर पूर्ण व्हावीत म्हणून मागील पंचेवीस वषार्पासून तालुक्यातील आवळी वासी तुटक्या व जीर्ण झालेल्या डोंग्यातून दररोज जीवघेणा प्रवास करीत आहेत. तालुक्यातील आवळी हे गाव चुलबंद व वैनगंगा नदिच्या काठावर वसलेले आहे. दोन नद्यांचे संगम लाभलेले हे गाव सोनी संगम म्हणून प्रसिध्द असले तरी दरवर्षी येणाऱ्या पुराचा तडाखा सहन करण्याची हिंमत अद्याप गावकऱ््यानी सोडली नाही. हे गाव बेटासारखे असले तरी अनेक विध्यार्थी दरवर्षी लाखांदूर, वडसा, ब्रम्हपुरी, येथे महाविध्यालयीन शिक्षणाकरीता नोकरीकरीता भर पावसाळ्यात डोंग्याने ये - जा करतात. १५० लोकसंख्या असलेले हे बेट स्वरुपी गावाचे यापुर्वी ईंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. शेती व घर बांधकामाकरीता शासनाकडुन जागा उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु संपुर्ण आवळी वाशियांचे पुनर्वसन करण्यात आले नसल्याने तसेच पुनर्वसन योग्य पद्धतीने न झाल्याने पुनर्वसन झाल्यानंतरही आवळीवासियांनी गाव सोडले नाही. पावसाळ्यात गावाबाहेर निघण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मात्र शाळा, शेती व इतर कार्यालयीन कामासाठी गावाबाहेर जाण्याआधी एकच मार्ग तो म्हणजे तुटक्या डोंग्याने प्रवास. शिक्षणाकरीता आवळी येथील विध्यार्थी सोनी, लाखांदुर, वडसा, ब्रम्हपुरी येथे दररोज जातात. पुर परिस्थीती व नदिला पाणी असल्याने स्वत: गावकरी व विध्यार्थी डोंगा हाकुन नदि पार करतात. ये - जा करण्याची ठरलेली वेळ नसल्याने गावकरिच डोंगा चालवितात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवळी येथील शेतकरी शुध्दा बिंधास्त स्वत: डोंगा चालवुन शेतीची कामे पार पाडतात. डोंगा पाण्यात उलटुन मरण पावल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यात असला अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन तालुका प्रशासन लक्ष देवुन असला तरी शक्यता नाकारता येत नाही. शिक्षिका पुरातून शाळेत जाते तेव्हा... आवळी येथील विध्यार्थी व गावक?्यांचा पुरातुन डोंग्याने प्रवास हा नित्याचाच असल्याने त्याना भिती वाटत नाही मात्र एका महिला शिक्षकाची नियुक्ती आवळी येथील जि. प. प्राथमीक शाळेत आहे. आवळी येथे वर्ग १ ते ४ पर्यंत आहेत २ शिक्षकी शाळेत २२ विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील ३ वषार्पासुन ती शिक्षीका पुरात व सोनी ते आवळी ५ कि. मी. चा प्रवास तुटक्या डोंग्यातुन करुन शिक्षणाचे कार्य प्रामाणीक पार पाडत आहे. अनेकदा विनंती अर्ज करुनही बदली होत नसल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी हितसबंध जोपासणाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करुन देण्याचे धाडस दाखवतात. मात्र त्या महिला शिक्षकाच्या विनंती अजार्चा साधा विचार झालेला नाही.