शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. 

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. चुलबंद खोऱ्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पाऊस लांबल्यास हलक्या धानाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे धान पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येसुद्धा पाऊस कोसळत आहे. जलसाठे पूर्णत्वाकडे जात असून काही ठिकाणी ओव्हर फ्लोचे चित्र अनुभवायला येत आहे. कापणी योग्य धान पावसाच्या दणक्यात मातीमोल होत आहे. लोंबी जड होत असल्याने संकट उभे आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम कालावधीचे धान कापणी योग्य झालेले आहेत. नियमित पाऊस व ढगाळ हवामानाने भारी धानसुद्धा लवकरच फुलोऱ्यावर येत आहेत. अशा संकटसमयी शेतकरी चिंतातुर असून करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा मान्सून राजस्थानमधून माघार घेतो. गत पाच वर्षांचा अभ्यास घेतला असता १५ सप्टेंबरनंतरच मान्सूनने माघार घेतलेली आहे. राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर यापूर्वी ठरविण्यात आली होती. परंतु हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊस लांबत असल्याचे दिसत आहे.

धान पिकावर रोगराईचे संकट ! - नियमित ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर रोगराईचे संकट आहे. करपा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, रसशोषक कीडी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. पावसामुळे फवारणीचे नियोजन फसत आहे. फवारणी न केल्यास अपेक्षित धान पीक हाती येण्याची शक्यता अत्यल्प आहे. लोंबी न भरणे, मानमोडी, हळद्या रोग, तुडतुडा यासारख्या रोगांची लागण दिसत आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परतीचा पाऊस लांबल्यास हंगाम ओल्या दुष्काळाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता आहे.

धान परिपक्व होऊन कापणी योग्य आहे. नियमित पाऊस व वाऱ्याने धान झोपलेला आहे. हंगाम हाती घेऊन डोळ्यांच्या समोर मातीमोल होत असल्याने हृदयाचे ठोके वाढलेले आहेत.-गजानन शिवणकर, शेतकरी  ढिवरखेडा

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी