शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

शेतकरी, शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:36 IST

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत शासन व प्रशासन उदासीन आहे. समस्या दुर्लक्षित ठेवून धरणात पाणी वाढवून प्रकल्पग्रस्तांचे जीवन अस्ताव्यस्त केल्या जात आहे.

पवनी : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत शासन व प्रशासन उदासीन आहे. समस्या दुर्लक्षित ठेवून धरणात पाणी वाढवून प्रकल्पग्रस्तांचे जीवन अस्ताव्यस्त केल्या जात आहे. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक आमदारांचे जनसंपर्क कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्यांनुसार मौजा खापरी (रेहपाडे) गावाची थांबविण्यात आलेली पुनर्वसन प्रक्रिया सुरु करण्यात यावी. खापरी गाव उमरेड -कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नेरला गावाची पुनर्वसन प्रक्रिया सुरु करावी. मौजा सुरबोडी गावाची ८० टक्के शेतजमीन अधिग्रहीत झाली. त्यामुळे गावठाणाची पुनर्वसन प्रक्रिया त्वरीत सुरु करावी, अशी मागणी आहे.नेरला उपसिंचन करीता जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्यासाठी पुनर्वसन अनुदान व पॅकेज त्वरीत देण्यात यावे. मौजा गायडोंगरी - कवडसी, उमरेड, कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने त्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रत्येक स्वतंत्र कुुटुंबाला नोकरी ऐवजी रु. ५ लक्ष देण्यात यावे, पुनर्वसन होईस्तोवर धरणातील पाण्याची पातळी २४१.५ मिटर तलांकाच्या पुढे वाढविण्यात येवू नये. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीत गावातील नागरिकांना अन्नधान्य व केरोसीन तेलाचे वाटप करण्यात यावे. प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी मासेमारीचे अधिकार देण्यात यावे. जिल्हा पुनर्वसन समितीचे गठण करण्यात यावे. शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनाअंतर्गत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन या योजना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात याव्यात, आदी मागण्या असलेले निवेदन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार कृती समितीचे संयोजक राम बांते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना व तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये नितीन कोदाने, तुलशीदास भोयर, भागवत दिघोरे, प्रदीप गजभिये, जितेंद्र रेहपाडे तसेच खापरी, गायडोंगरी, परसोडी, नेरला येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर मच्छीमार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका / शहर प्रतिनिधी)