शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

शेतकऱ्यांनो, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:11 IST

बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : भंडारा कृषी विभागातर्फे शेतकरी दिन, विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित शेतकºयांना केले.पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारला कृषी विभागाच्या वतीने शेतकरी दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा गोडमाटे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, साकोली कृषी विन केंद्राचे तज्ज्ञ डॉ.शामकुवर, बलसाने, कृषी उपसंचालक भंडारा, कृषीभूषण पुरस्कारप्राप्त अण्णाजी हांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व्यासपीठावर उपस्थित होते.प्रज्ञा गोडमाटे यांनी मार्गदर्शनात शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त फळबागा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.अण्णाजी हांडे यांनी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास संकटावर मात करता येते. असा विश्वास बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांनीही आपला शेतीव्यवसाय प्रामाणिकपणे करून सेंद्रीय शेतीसाठी योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले.कृषीशास्त्रज्ञ डॉ.शामकुवर यांनी शेतकऱ्यांना उत्पादनवाढीच्या विविध बाबी समजावून सांगून कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेतीत बदल करण्याचे आवाहन केले.शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांचा खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते तसेच जिल्हा कृषी अधिक्षक चव्हाण यांच्या हस्ते, प्रज्ञा गोडगाटेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये शेषराव निखाडे (कृषीभूषण पुरस्कार प्राप्त) शेतकरी, यादोराव मेंढे शेतीनिष्ठ शेतकरी, डॉ.संजय एकापुरे प्रगतशील शेतकरी, तानाजी गायधने चिखलीचे प्रयोगशील शेतकरी, दुर्योधन सयाज, देवानंद गायधने या जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सदर कार्यक्रमात भातपिकांचे कीड, रोग सर्वेक्षण, शेतातील महिलांचा सहभाग, खोडकिडींच्या नियंत्रणासाठीची उपाययोजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून सेंद्रीय शेतीसाठी तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत आवाहन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पिक पध्दतीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.कृषीदिनासाठी जिल्हाभरातून अनेक शेतकरी तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, मंडळ अधिकारी होमराज धांडे, डी.एस. अहिर, पर्यवेक्षक बी.डी. बावनकर, ए.के. डोर्लीकर यांच्यासह कृषी कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले. संचालन आनंद मोहतुरे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोडापे, मेहर, नान्हे, मेश्राम, गिरीश रणदिवे, अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.