शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणातही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:03 IST

शेतकरी संकटात : याद्या तयार असल्याने मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी २०२४ चे अवकाळी पावसाने धान पिकांचे कडपे नुकसानग्रस्त झाले. यानंतर खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पुरांचे पाणी धान पिकांत शिरले. दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांचे खात्यात आर्थिक मदत पोहोचली नाही. परिणामी पोळा सणांवर विरजण पडले आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बचत खात्यात अनुदान घातले जात आहे. लाडक्या बहिणीला दीड हजाराची आर्थिक मदत दिली जात असली त्यांचे शेतकरी कुटुंब मात्र आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहेत. उन्हाळी २०२४ वर्षात शेतकऱ्यांची उन्हाळी धानाचे पीक घेतले आहे. धानाची कापणी केल्यानंतर शेतात धानाचे कडपे ठेवले. अवकाळी पावसाने धानाचे कडपे ओलेचिंब झाले होते. धानाचे कडप्यांना कोंब फुटले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. 

उन्हाळी धान पिकांचे नुकसान झाले असता तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याद्या तयार करण्यात आल्यानंतर महसूल विभागात सादर करण्यात आले आहेत. परंतु उन्हाळी धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. 

वैनगंगा आणि बावनथडी नद्याचे काठावर अनेक गावे आहेत. पावसाळ्यात या नद्यांना दोनदा पूर आलेला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर धान पिकांचे नुकसान झाले आहे. पूर शिरले नसल्याचे पंचनामे तलाठ्यांच्या पथकाने करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. परंतु या पंचनाम्यावर सरपंच यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर महिनाभरात नुकसान दिसून येत आहे.

पुरांचे पाणी शिरलेल्या शेतात धान पिकांना अनेक रोगराईने ग्रासले आहे. यानंतर पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. पूर शिरलेल्या धान पिकांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे सरपंच यांनी दिले आहेत. या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु या महत्त्वपूर्ण प्रश्नावर कुणी बोंबलत नाहीत. पोळा सण दारात असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही.

उन्हाळी आणि खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छदामही शेतकऱ्यांचे बचत खात्यात देण्यात आला नाही. शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी आर्थिक मदतीच्या मागणीवरून पोळा फुटणार असल्याचे सांगितले आहे.

वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांचे नुकसान सिहोरा परिसरात नद्याचे काठावर गावे आणि शेती असल्याने पुरांचे पाणी शेतात शिरत आहे. धान पिकांचे नुकसान होत आहे. पुरांचे पाण्याची नोंद घेण्यासाठी यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही. मुख्यालयात कुणी वास्तव्य करीत नाहीत. पूर ओसरल्यानंतर पुरांचे पाणी शिरले नसल्याचे शेरा देऊन मोकळे होत आहेत. हा वंचित करण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पुरांचे पाणी शिरत असल्याने सरसकट नोंद करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा