शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक नष्ट होऊनही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ...

ठळक मुद्देपीक विम्यातील नियम, निकष क्लिष्ट । कोंढा परिसरातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर अनेक शेतकऱ्यांचे पीक पावसाच्या पुरात वाहून गेले. त्यांचे नुकसान विमा कंपनीला कसे दाखवयचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नैसर्गिक नुकसान विमा कंपनीला पुराव्यासह दाखविणे आवश्यक आहे.शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेताना त्यांचा विमा रक्कम कपात करुन पीक कर्ज खात्यात जमा केले जाते. आघाडी शासनाच्या काळात पीक विमा ऐच्छिक होते. पण सध्याच्या भाजप सेना युतीच्या काळात पीक विमा सर्वांना आवश्यक केले आहे. त्यामुळे इच्छा नसताना विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळण्याकरिता विमा योजनेत घालून दिलेले नियम, निकष क्लिष्ट आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे शेतकऱ्यांसह छायाचित्र काढणे, पीक विमा उतरवल्याची बँकेच्या नावांची पावती, नुकसान झाल्याच्या अर्जावर संबंधित कृषी सहायकाची स्वाक्षरी, सातबारा, आठ अ हे दस्ताऐवज नुकसान झाल्याच्या ७२ तासांत म्हणजे तीन दिवसात विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नुकसान ग्राह्य धरल्या जात नाही, हे सर्व अशक्य आहे.यापुर्वी पीक विम्याच्या नुकसानीचा सर्व्हे महसूल विभाग करीत होते. यामध्ये शेतकरी आणि विमा कंपनीचा संबंध येत नव्हता. महसूल विभागच नुकसानीचा अहवाल सादर करीत होता.शेतकऱ्यांची लूट?शासनाने पीक विमा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका कंपनीस मान्यता दिली आहे. भंडारा जिल्ह्यात अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनी या खासगी कंपनीस विमा काढण्याचे काम दिले आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकºयांचा विमा जबरदस्तीने उतरविले जाते. पण फायदा आतापर्यंत नाममात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्व प्रकारच्या विम्याकरिता कंपनीचे एजन्ट दारोदारी जातात. त्या विम्याचे नियमाप्रमाणे दावा केल्यास लाभ मिळतो. मात्र, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची शाश्वती नाही, ही शेतकºयांची लूट आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पीक कर्ज घेतांना विमा रक्कम कपात करणे बंद झाली पाहिजे, विमा हा ऐच्छिक असावयास पाहिजे आणि विम्याचे नियम, निकष बदलविणे आवश्यक आहे.- विजय काटेखायेशिवसेना प्रमुख, पवनी तालुका

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा