शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक नष्ट होऊनही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ...

ठळक मुद्देपीक विम्यातील नियम, निकष क्लिष्ट । कोंढा परिसरातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर अनेक शेतकऱ्यांचे पीक पावसाच्या पुरात वाहून गेले. त्यांचे नुकसान विमा कंपनीला कसे दाखवयचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नैसर्गिक नुकसान विमा कंपनीला पुराव्यासह दाखविणे आवश्यक आहे.शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेताना त्यांचा विमा रक्कम कपात करुन पीक कर्ज खात्यात जमा केले जाते. आघाडी शासनाच्या काळात पीक विमा ऐच्छिक होते. पण सध्याच्या भाजप सेना युतीच्या काळात पीक विमा सर्वांना आवश्यक केले आहे. त्यामुळे इच्छा नसताना विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळण्याकरिता विमा योजनेत घालून दिलेले नियम, निकष क्लिष्ट आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे शेतकऱ्यांसह छायाचित्र काढणे, पीक विमा उतरवल्याची बँकेच्या नावांची पावती, नुकसान झाल्याच्या अर्जावर संबंधित कृषी सहायकाची स्वाक्षरी, सातबारा, आठ अ हे दस्ताऐवज नुकसान झाल्याच्या ७२ तासांत म्हणजे तीन दिवसात विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नुकसान ग्राह्य धरल्या जात नाही, हे सर्व अशक्य आहे.यापुर्वी पीक विम्याच्या नुकसानीचा सर्व्हे महसूल विभाग करीत होते. यामध्ये शेतकरी आणि विमा कंपनीचा संबंध येत नव्हता. महसूल विभागच नुकसानीचा अहवाल सादर करीत होता.शेतकऱ्यांची लूट?शासनाने पीक विमा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका कंपनीस मान्यता दिली आहे. भंडारा जिल्ह्यात अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनी या खासगी कंपनीस विमा काढण्याचे काम दिले आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकºयांचा विमा जबरदस्तीने उतरविले जाते. पण फायदा आतापर्यंत नाममात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्व प्रकारच्या विम्याकरिता कंपनीचे एजन्ट दारोदारी जातात. त्या विम्याचे नियमाप्रमाणे दावा केल्यास लाभ मिळतो. मात्र, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची शाश्वती नाही, ही शेतकºयांची लूट आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पीक कर्ज घेतांना विमा रक्कम कपात करणे बंद झाली पाहिजे, विमा हा ऐच्छिक असावयास पाहिजे आणि विम्याचे नियम, निकष बदलविणे आवश्यक आहे.- विजय काटेखायेशिवसेना प्रमुख, पवनी तालुका

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा