शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धान पीक नष्ट होऊनही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ...

ठळक मुद्देपीक विम्यातील नियम, निकष क्लिष्ट । कोंढा परिसरातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर अनेक शेतकऱ्यांचे पीक पावसाच्या पुरात वाहून गेले. त्यांचे नुकसान विमा कंपनीला कसे दाखवयचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नैसर्गिक नुकसान विमा कंपनीला पुराव्यासह दाखविणे आवश्यक आहे.शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेताना त्यांचा विमा रक्कम कपात करुन पीक कर्ज खात्यात जमा केले जाते. आघाडी शासनाच्या काळात पीक विमा ऐच्छिक होते. पण सध्याच्या भाजप सेना युतीच्या काळात पीक विमा सर्वांना आवश्यक केले आहे. त्यामुळे इच्छा नसताना विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळण्याकरिता विमा योजनेत घालून दिलेले नियम, निकष क्लिष्ट आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे शेतकऱ्यांसह छायाचित्र काढणे, पीक विमा उतरवल्याची बँकेच्या नावांची पावती, नुकसान झाल्याच्या अर्जावर संबंधित कृषी सहायकाची स्वाक्षरी, सातबारा, आठ अ हे दस्ताऐवज नुकसान झाल्याच्या ७२ तासांत म्हणजे तीन दिवसात विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नुकसान ग्राह्य धरल्या जात नाही, हे सर्व अशक्य आहे.यापुर्वी पीक विम्याच्या नुकसानीचा सर्व्हे महसूल विभाग करीत होते. यामध्ये शेतकरी आणि विमा कंपनीचा संबंध येत नव्हता. महसूल विभागच नुकसानीचा अहवाल सादर करीत होता.शेतकऱ्यांची लूट?शासनाने पीक विमा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका कंपनीस मान्यता दिली आहे. भंडारा जिल्ह्यात अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनी या खासगी कंपनीस विमा काढण्याचे काम दिले आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकºयांचा विमा जबरदस्तीने उतरविले जाते. पण फायदा आतापर्यंत नाममात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्व प्रकारच्या विम्याकरिता कंपनीचे एजन्ट दारोदारी जातात. त्या विम्याचे नियमाप्रमाणे दावा केल्यास लाभ मिळतो. मात्र, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची शाश्वती नाही, ही शेतकºयांची लूट आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पीक कर्ज घेतांना विमा रक्कम कपात करणे बंद झाली पाहिजे, विमा हा ऐच्छिक असावयास पाहिजे आणि विम्याचे नियम, निकष बदलविणे आवश्यक आहे.- विजय काटेखायेशिवसेना प्रमुख, पवनी तालुका

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा