शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो.

ठळक मुद्देबळीराजाला पावसाची प्रतीक्षा : गावागावातच मुबलक मजूर उपलब्ध होण्याची दाट शक्यता

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात यावर्षी रविवारी २४ मे रोजी प्रवेश होत असून रोहिणी नक्षत्रात यंदाचा मान्सून बरसेल, या आशेने शेतकऱ्यांनीही मान्सूनपुर्व कामाला मोठ्या तन मन धनाने सुरुवात केली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या तप्त उन्हामुळे शेतकऱ्यांना आता पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील काडी कचरा गोळा करणे, धुरा साफ करणे, शेतात शेणखत घालणे, नांगरणी करून ठेवणे इत्यादी आवश्यक कामे शेतकरी मोठ्या आशेने व आनंदाने करताना दिसत आहे.बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो. त्या नुसार शेतीच्या कामाला सुरुवात करतो.यंदा रोहिणी नक्षत्रात पहिला पाऊस बरसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंगाला भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता वातावरणात बदल होत आहे. लवकर पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकºयांनीही मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. पंचांगानुसार पावसाची एकूण बारा नक्षत्रे आहेत. त्यानुसार नक्षत्राचे वाहन, पाऊसमान अंदाजे सांगितले आहे. यावर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्रापासून होत आहे. ७ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन म्हैस आहे. पाऊस चांगला होईल तर २१ जूनपासून आद्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन घोडा आहे. जुलैपासून पुनर्वसु नक्षत्र सुरु होत आहे. वाहन उंदीर आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा पंचांगानुसार विविध अनुमान सांगितले आहेअड्याळ आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी संकटकाळात नेरला उपसा सिंचनाचा मोठा आधार मिळत आला. परंतु दरवेळी काही तरी विषय व्हायचा आणि जेव्हा शेतकरी रस्यावर यायचे त्यावेळी पाणी मिळायचे. शेतकऱ्यांना अडयाळ आणि परिसरात सध्या शेतकरी एकच चर्चा करत आहेत ते म्हणजे नेरला उपसा सिंचन सुरु व्हायला गतवर्षी पाण्याची पातळी नव्हती, निदान आता तरी पाण्याची पातळी उपलब्ध करून ठेवली तर पुढे संकटकाळात हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आता यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती