शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

शेणखताला आला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:34 IST

Bhandara : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेणखताकडे वळला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क सानगडी : काही वर्षांपासून रासायनिक खताच्या अतोनात वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी मात्र जमिनीचा कस हळूहळू कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी शेणखताकडे वळला आहे. मात्र, शेतीत टाकण्यासाठी लागणाऱ्या शेणखताचा तुटवडा असल्याने याच शेणखताला आता सोन्याचा भाव आल्याचे चित्र सध्या ग्रामीम भागात पाहावयास मिळत आहे.

आपल्या देशात बहुतेक लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखताचा वापर कमी होत आहे आणि रासायनिक खताचा वापर वाढला आहे. मात्र, रासायनिक खाताच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. हे गंभीर परिणाम लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा सेंद्रिय खताकडे वळला आहे. सध्या पंधराशे रुपयांपर्यंत ट्रॅक्टरची ट्राली भरून शेणखत मिळत आहे. शेणखताने जमीनही पिकते आणि आरोग्यही टिकून राहते. रासायनिक खतामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

रासायनिक खताचे दुष्परिणामरासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. शेतजमीन नापिक होण्याचा धोका असतो. पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. पाण्याचे स्रोत दूषित होतात.

रासायनिक खताच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते. तरीही रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढला आहे. परिणामी जमिनीचा मूळ पोत दिवसेंगणिक खराब होत चालला आहे. सांगुही किवा जनजागृती करूनही सेंद्रीय खतांचा वापर हवा तसा वाढलेला नाही. त्यामुळ सध्या हळूहळू का असेना सेंद्रीय खताचा वापर वाढणे अंत्यत आवश्यक झालेले आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी