शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

कृषी स्वावलंबन योजनेच्या स्थगितीने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

ही योजना सन १९८२ पासून विशेष घटक योजना या नावाने राबवली जात होती. परंतु २०१७ ला तत्कालीन सरकारने जानेवारी ...

ही योजना सन १९८२ पासून विशेष घटक योजना या नावाने राबवली जात होती. परंतु २०१७ ला तत्कालीन सरकारने जानेवारी २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे केले होते. एवढेच नव्हे तर या योजनेच्या अनुदानात वाढ करीत सुधारित निकषानुसार ही योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत विहीर खोदकाम व बांधकाम, वीज कनेक्शन, विद्युत पंप संच, ठिबक संच असे लाभ दिले जात होते. दरवर्षी आगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जात होती. परंतु यावर्षी राज्य शासनाने या योजनेला कोरोनामुळे निधी नसल्याचा मुद्दा पुढे करीत राबविण्यास स्थगिती दिली आहे. शासनाने स्थगिती पत्र मिळाल्याने योजनेचे प्रस्ताव घेणे बंद आहे, गेल्या ३५ वर्षापासून सुरू असलेल्या योजनेला शासनाने स्थगिती दिल्याने मागासवर्गीय शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पूर्वीप्रमाणे ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारी योजना

मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारी ही योजना आहे. शासनाने या योजनेला स्थगिती देत अंमलबजावणी पुढे ढकली. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे होते. परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मात्र गप्प आहे. हे विशेष. या योजनेचा गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याने पिकांना पाणी देण्याची सोय होत होती. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेता येत होती. यामुळे गरीब शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येत होती. यामुळे ही योजना सुरू ठेवणे गरजेचे होते. ही योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोट

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे या योजनेचे प्रस्ताव घेणे सध्या बंद आहे. पुढील आदेश येईपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करू नये."

- एम. के.जांभुळकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, लाखनी.

कोट

"मागील युती शासनाच्या काळात निधी वाढवून देत या योजनेला अधिक स्वरूप प्राप्त करून दिले होते. परंतु आघाडी सरकारच्या काळात या योजनेला स्थगिती देण्यात आली. मग मागासवर्गीयांच्या योजनेसाठी शासनाकडे निधी नाही''''''''का? या योजनेची अंमलबजावणी पुढे ढकलून शासनाने मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे ही स्थगिती उठवून पूर्ववत लाभ मागासवर्ग शेतकऱ्यांना मिळावा."

-आकाश कोरे,

जि. प. सदस्य, मुरमाडी/ सा