शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कृषी स्वावलंबन योजनेच्या स्थगितीने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

ही योजना सन १९८२ पासून विशेष घटक योजना या नावाने राबवली जात होती. परंतु २०१७ ला तत्कालीन सरकारने जानेवारी ...

ही योजना सन १९८२ पासून विशेष घटक योजना या नावाने राबवली जात होती. परंतु २०१७ ला तत्कालीन सरकारने जानेवारी २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे केले होते. एवढेच नव्हे तर या योजनेच्या अनुदानात वाढ करीत सुधारित निकषानुसार ही योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत विहीर खोदकाम व बांधकाम, वीज कनेक्शन, विद्युत पंप संच, ठिबक संच असे लाभ दिले जात होते. दरवर्षी आगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जात होती. परंतु यावर्षी राज्य शासनाने या योजनेला कोरोनामुळे निधी नसल्याचा मुद्दा पुढे करीत राबविण्यास स्थगिती दिली आहे. शासनाने स्थगिती पत्र मिळाल्याने योजनेचे प्रस्ताव घेणे बंद आहे, गेल्या ३५ वर्षापासून सुरू असलेल्या योजनेला शासनाने स्थगिती दिल्याने मागासवर्गीय शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पूर्वीप्रमाणे ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारी योजना

मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारी ही योजना आहे. शासनाने या योजनेला स्थगिती देत अंमलबजावणी पुढे ढकली. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे होते. परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मात्र गप्प आहे. हे विशेष. या योजनेचा गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याने पिकांना पाणी देण्याची सोय होत होती. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेता येत होती. यामुळे गरीब शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येत होती. यामुळे ही योजना सुरू ठेवणे गरजेचे होते. ही योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोट

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे या योजनेचे प्रस्ताव घेणे सध्या बंद आहे. पुढील आदेश येईपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करू नये."

- एम. के.जांभुळकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, लाखनी.

कोट

"मागील युती शासनाच्या काळात निधी वाढवून देत या योजनेला अधिक स्वरूप प्राप्त करून दिले होते. परंतु आघाडी सरकारच्या काळात या योजनेला स्थगिती देण्यात आली. मग मागासवर्गीयांच्या योजनेसाठी शासनाकडे निधी नाही''''''''का? या योजनेची अंमलबजावणी पुढे ढकलून शासनाने मागासवर्गीय शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे ही स्थगिती उठवून पूर्ववत लाभ मागासवर्ग शेतकऱ्यांना मिळावा."

-आकाश कोरे,

जि. प. सदस्य, मुरमाडी/ सा