शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वाढीव हक्काच्या मोबदल्यापासून शेतकरी व प्रकल्पग्रस्त वंचित

By admin | Updated: February 12, 2017 00:20 IST

रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.

लोकप्रतिनिधी अनभिज्ञ : शेतकरी संकटातअड्याळ : प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मुल्यांकन तिथी कोणती घ्यावी याबाबत राज्य शासनाने सप्टेंबर २०१४ मध्ये केंद्राकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानंतर वर्षानंतर २६ आॅक्टोंबर २०१५ रोजी केंद्राने राज्य सरकारला पत्र देऊन १ जानेवारी २०१४ ही मुल्यांकन तिथी ग्राह्य धरण्याचे निर्देश देऊनही अजुनही या निर्देशांची अंमलबजावणी राज्य शासनाने केली नाही. राज्य शासनाने मागितलेल्या मार्गदर्शनाची वाट न बघता दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील भुसंपादन अधिकाऱ्यांनी अनेक निवाडे करून मोकळे झाले. १ जानेवारी २०१४ ही मुल्यांकन तिथी न धरता जुन्या कायद्याच्या १८९४ कलम ४ नुसार बाजारभाव निश्चित करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येते परंतु ही आपत्ती दिवसाढवळ्या हल्ला केल्यासारखी असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द बावनथडी या दोन मोठ्या सिंचन प्रकल्पासह निम्न चुलबंद, भिमलकसा हे प्रकल्प आहेत या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या मात्र मोबदला जुन्याच पद्धतीने देण्यात आला. महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समिती या विषयावर आंदोलन व इतर लोकशाही न्याय मार्गाचा उपयोग करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यास शेतकऱ्यांचा व समितीचा वेळ वाचेल असे समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी सांगितले. सध्या नवीन कायद्याच्या कलम २६ (१) व २६ (१) (ब) ची तुलना न करता व कलम ११ ची नोटीस न काढता सरळ वाटाघाटी करून अधिकारी बेकायदेशीरपणे भुसंपादन करीत आहेत हे बेकायदेशिरपणे करण्यात येणारे भुसंपादन त्यांनी त्वरीत थांबवावे, कायदा व नियमानुसार हे नाही केल्यास याच कायद्याच्या कलम ८४ (३) व कलम ८७ नुसार फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)