शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:59 IST

भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देराजेदहेगावचा पाणी प्रश्न : पालकमंत्री व आमदार, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर राजेदहेगाव आहे. तेथील पाणी प्रश्नासाठी गावकरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरु आहे. सदर पाणी प्रश्न कसा सुटेल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहे. या प्रश्नावरून ग्रामपंचायतही हतबल झालेली दिसत आहे. गावकºयांपुढे ग्रामपंचायतची एकही चालत नाही. परिणामी ग्रामपंचायत कामकाज ठप्प झालेले दिसून येते. दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी नारायण ढोबळे यांची राजेदहेगाव इंदिरानगर पांदन रस्त्यालगत गट क्रमांक १८३ मध्ये उन्हाळ्यात १७ बोअर खोदले होते. त्यातील एकाही बोअरला पाणी लागले नाही. दरम्यान दोन ते तीन महिन्यापूर्वी १८ वी बोअर १५६ फुट खोल खोदली. त्यावेळी तीन इंच पाणी लागले होते. मुबलक पाणी लागल्याने ग्रामपंचायत कमेटी व काही गैरकायद्याच्या मंडळींनी विंधन विहिर बंद पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही गावाला ५० वर्षापासून हिरेखण यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. त्यातही राजकीय असामाजिक तत्वांनी व्यत्यय आणलेला आहे.ग्रामपंचायत विंधन विहिर गाव फिडरवर असल्याने २४ तास विद्युत पुरवठा सुरु असतो. गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीद्वारे ९ ते १० तासात पूर्ण भरते. मात्र गावातील काही असामाजिक लोकांनी सरपंचास सोबत घेऊन ग्रामपंचायत विंधन विहिर बंद केले. त्याला कुलूप लावून गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.प्रशासनाने पडताळणी केल्यास यातील सत्य समोर येईल. दरम्यान विंधन विहिरीला गावातील एका राजकीय पुढाºयाद्वारे नुकसान करणार या आशयाचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना दिले आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोअर वेलला कुलुप असल्याने गावकºयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्याथा गावात असंतोष निर्माण होऊन शांतता भंग पावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी