शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:59 IST

भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देराजेदहेगावचा पाणी प्रश्न : पालकमंत्री व आमदार, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर राजेदहेगाव आहे. तेथील पाणी प्रश्नासाठी गावकरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरु आहे. सदर पाणी प्रश्न कसा सुटेल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहे. या प्रश्नावरून ग्रामपंचायतही हतबल झालेली दिसत आहे. गावकºयांपुढे ग्रामपंचायतची एकही चालत नाही. परिणामी ग्रामपंचायत कामकाज ठप्प झालेले दिसून येते. दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी नारायण ढोबळे यांची राजेदहेगाव इंदिरानगर पांदन रस्त्यालगत गट क्रमांक १८३ मध्ये उन्हाळ्यात १७ बोअर खोदले होते. त्यातील एकाही बोअरला पाणी लागले नाही. दरम्यान दोन ते तीन महिन्यापूर्वी १८ वी बोअर १५६ फुट खोल खोदली. त्यावेळी तीन इंच पाणी लागले होते. मुबलक पाणी लागल्याने ग्रामपंचायत कमेटी व काही गैरकायद्याच्या मंडळींनी विंधन विहिर बंद पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही गावाला ५० वर्षापासून हिरेखण यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. त्यातही राजकीय असामाजिक तत्वांनी व्यत्यय आणलेला आहे.ग्रामपंचायत विंधन विहिर गाव फिडरवर असल्याने २४ तास विद्युत पुरवठा सुरु असतो. गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीद्वारे ९ ते १० तासात पूर्ण भरते. मात्र गावातील काही असामाजिक लोकांनी सरपंचास सोबत घेऊन ग्रामपंचायत विंधन विहिर बंद केले. त्याला कुलूप लावून गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.प्रशासनाने पडताळणी केल्यास यातील सत्य समोर येईल. दरम्यान विंधन विहिरीला गावातील एका राजकीय पुढाºयाद्वारे नुकसान करणार या आशयाचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना दिले आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोअर वेलला कुलुप असल्याने गावकºयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्याथा गावात असंतोष निर्माण होऊन शांतता भंग पावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी