शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:59 IST

भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देराजेदहेगावचा पाणी प्रश्न : पालकमंत्री व आमदार, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर राजेदहेगाव आहे. तेथील पाणी प्रश्नासाठी गावकरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरु आहे. सदर पाणी प्रश्न कसा सुटेल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहे. या प्रश्नावरून ग्रामपंचायतही हतबल झालेली दिसत आहे. गावकºयांपुढे ग्रामपंचायतची एकही चालत नाही. परिणामी ग्रामपंचायत कामकाज ठप्प झालेले दिसून येते. दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी नारायण ढोबळे यांची राजेदहेगाव इंदिरानगर पांदन रस्त्यालगत गट क्रमांक १८३ मध्ये उन्हाळ्यात १७ बोअर खोदले होते. त्यातील एकाही बोअरला पाणी लागले नाही. दरम्यान दोन ते तीन महिन्यापूर्वी १८ वी बोअर १५६ फुट खोल खोदली. त्यावेळी तीन इंच पाणी लागले होते. मुबलक पाणी लागल्याने ग्रामपंचायत कमेटी व काही गैरकायद्याच्या मंडळींनी विंधन विहिर बंद पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही गावाला ५० वर्षापासून हिरेखण यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. त्यातही राजकीय असामाजिक तत्वांनी व्यत्यय आणलेला आहे.ग्रामपंचायत विंधन विहिर गाव फिडरवर असल्याने २४ तास विद्युत पुरवठा सुरु असतो. गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीद्वारे ९ ते १० तासात पूर्ण भरते. मात्र गावातील काही असामाजिक लोकांनी सरपंचास सोबत घेऊन ग्रामपंचायत विंधन विहिर बंद केले. त्याला कुलूप लावून गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.प्रशासनाने पडताळणी केल्यास यातील सत्य समोर येईल. दरम्यान विंधन विहिरीला गावातील एका राजकीय पुढाºयाद्वारे नुकसान करणार या आशयाचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना दिले आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोअर वेलला कुलुप असल्याने गावकºयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्याथा गावात असंतोष निर्माण होऊन शांतता भंग पावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी