शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जनावरांसाठी लावलेल्या वीजेच्या सापळ्यात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 24, 2024 19:16 IST

शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले.

भंडारा : वन्य जीवांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने शेतात जीवंत वीज तारा पसरवून ठेवल्या होत्या. मात्र त्याची तिळमात्रही कल्पना नसल्याने आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी निघालेल्या अन्य शेतकऱ्याचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. विजय तुळशीराम खोब्रागडे (५४ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना पवनी तालुक्यातील नेरला गावच्या शेतशिवारात घडली.

शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले. शिवारातील शेतकरी दीपक बाबुराव खोब्रागडे हे आपल्या शेतावर जात असताना त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने नेरलाचे पोलिस पाटील रघुपती भोगे यांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जीवंत विजेचा तार त्यांच्या दोन्ही पायांना चिकटूून असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह काढण्यात आला. अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह ठाणेदार धनंजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी घनशाम ठोंबरे यांनी भेट दिली.

पिकांना पाणी देण्यासाठी गेला अन् मृत्यू ओढावलाविजय खोब्रागडे हे शनिवार पहाटे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी फावडे घेऊन निघाले होते. मार्गात शामराव लोहारे यांचे शेत आहे. त्यांनी वन्यजीवांना रोखण्यासाठी शेतात सेंट्रिंग तारांचे कुंपण करून जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र याची कल्पना नसल्याने ताराचा दोन्ही पायाला स्पर्श होताच जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Farmerशेतकरी