शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने २० गुंठ्यात पिकविला ७५ क्विंटल कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 15:23 IST

Bhandara news पवनी तालुक्यातील जुनोना येथील मुरलीधर दामोदर वंजारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या एकरात ७५ क्विंटल कांद्याचे उत्पादन घेऊन आधुनिक शेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.

ठळक मुद्देजुनोनाच्या शेतकऱ्याचा आदर्श तंत्रज्ञानाच्या मदतीने साधली उन्नती

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती बदलाचा अवलंब करून स्वतःमध्ये बदल करीत आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पवनी तालुक्यातील जुनोना येथील मुरलीधर दामोदर वंजारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या एकरात ७५ क्विंटल कांद्याचे उत्पादन घेऊन आधुनिक शेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.

मुरलीधर वंजारी हे मागील २० वर्षांपासून कांदा पिकाची लागवड करीत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने व वाणाची योग्य निवड केली नसल्याने त्यांना आतापर्यंत कांद्याचे फारसे उत्पादन हाती येत नव्हते. अशातच भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड व तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने यांची भेट झाली. वंजारी यांना भीमाशंकर शुभ्र या वाणाची माहिती झाली. मात्र हे बियाणे बाजारात उपलब्ध होत नव्हते यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा यांनी पुणे येथील कांदा व लसूण अनुसंधान, केंद्राशी संपर्क साधून जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे मिळवून दिले. भीमाशंकर शुभ्र हा कांद्याने वान जिल्ह्यातील हवामानाशी सुसंगत तसेच कांदा हा टिकाऊ, चमकदार व कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा असून, तिन्ही ऋतूमध्ये रोगाला बळी न पडणारा असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना हे बियाणे मिळवून दिले. त्यानुसार वंजारी यांनी कांदा पिकाची लागवड अर्ध्या एकरात केली. त्यांना आतापर्यंत अर्ध्या एकर कांदा लागवडीसाठी तीन हजार, निंदन खर्च ५००, खत २५००, कीटकनाशक फवारणी ३०००, पिकाची काढणी दोन हजार व इतर एक हजार असा एकूण ११,००० रुपये खर्च आला. त्यांना एकूण ७५ क्विंटल कांद्याला ९५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. त्यांना एकूण ७१ हजार दोनशे पन्नास रुपयांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये त्यांना साठ हजार दोनशेपन्नास रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे पारंपरिक धान पट्ट्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पीक पद्धतीत बदल केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे पवनी आणि भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गायधने या शेतकऱ्यांनी उत्पन्नातून सिद्ध करून दाखवले आहे.

भीमाशंकर हा कांदा चांगला आहे. केवळ कृषी विभागामुळेच मला हे बियाणे पुणे येथून उपलब्ध होऊ शकले. पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होतो. मात्र एवढे उत्पन्न कधीच मिळाले नाही. अर्ध्या एकरात मला खर्चवजा जाता ६० हजार रुपयांचा कांदा पिकातून निव्वळ नफा झाला आहे. शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करावा.

मुरलीधर वंजारी, शेतकरी जुनाेना.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा व लसूण अनुसंधान केंद्र पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे उपलब्ध करून दिले. अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लागवड केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी कृषी विभागाच्या कांदा चाळ योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. पीक पद्धतीत बदल ही काळाची गरज बनली आहे.

शांतिलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :agricultureशेती