शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

लाखांदुर तालुक्यात स्वच्छ भारत मिशन चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात ...

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. गोदरीमुक्त अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी अंतर्गत वैयक्तिक शौचालय निर्मितीचे उद्दिष्टपूर्ती होत नाही तोच शासनाने सार्वजनिक शौचालय निर्मितीला प्राधान्य देत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात सार्वजनीक शौचालय निर्मिती करण्यात आली.

सदर बांधकामासाठी १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के शासन निधी अंतर्गत जवळपास २ लक्ष रु.चा निधी उपलब्ध करण्यात आला.

सदर निधी खर्चून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम देखील करण्यात आले.मात्र बांधकाम होऊन वर्षदेखील लोटत नाही तोच तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा झाल्याचे चित्र आहे.अनेक गावातील शौचालयाच्या इमारतीच्या साहित्याची नासधूस झाल्याची ओरड आहे.

तालुल्यातील अनेक सार्वजनिक इमारतीचे दरवाजे,शौचास बैठक पात्र,हात धुण्याचे पात्र यासह अन्य साहित्याची तोडफोड झाल्याची चर्चा आहे.यासबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला असतांना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.

दरम्यान, बांधकाम पुर्ण होताच शासन निधीची तात्काळ उचल होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे.मात्र सदर निधीची उचल होतांना देखभालीचे काय असा सवाल देखील सर्वत्र केला जात आहे. एकंदरीत लक्षावधी रु.चा निधी खर्चून गावागावात शासनाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत शौचालयाचे बांधकाम झाले खरे.मात्र शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व स्थानिक नागरिकांच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याची ओरड आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शासन पुरस्कृत या लोकोपयोगी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.