शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लाखांदुर तालुक्यात स्वच्छ भारत मिशन चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात ...

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. गोदरीमुक्त अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी अंतर्गत वैयक्तिक शौचालय निर्मितीचे उद्दिष्टपूर्ती होत नाही तोच शासनाने सार्वजनिक शौचालय निर्मितीला प्राधान्य देत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात सार्वजनीक शौचालय निर्मिती करण्यात आली.

सदर बांधकामासाठी १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के शासन निधी अंतर्गत जवळपास २ लक्ष रु.चा निधी उपलब्ध करण्यात आला.

सदर निधी खर्चून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम देखील करण्यात आले.मात्र बांधकाम होऊन वर्षदेखील लोटत नाही तोच तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा झाल्याचे चित्र आहे.अनेक गावातील शौचालयाच्या इमारतीच्या साहित्याची नासधूस झाल्याची ओरड आहे.

तालुल्यातील अनेक सार्वजनिक इमारतीचे दरवाजे,शौचास बैठक पात्र,हात धुण्याचे पात्र यासह अन्य साहित्याची तोडफोड झाल्याची चर्चा आहे.यासबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला असतांना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.

दरम्यान, बांधकाम पुर्ण होताच शासन निधीची तात्काळ उचल होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे.मात्र सदर निधीची उचल होतांना देखभालीचे काय असा सवाल देखील सर्वत्र केला जात आहे. एकंदरीत लक्षावधी रु.चा निधी खर्चून गावागावात शासनाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत शौचालयाचे बांधकाम झाले खरे.मात्र शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व स्थानिक नागरिकांच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याची ओरड आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शासन पुरस्कृत या लोकोपयोगी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.