शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

लाखांदुर तालुक्यात स्वच्छ भारत मिशन चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात ...

लाखांदूर: शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामीण जनतेच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. गोदरीमुक्त अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी अंतर्गत वैयक्तिक शौचालय निर्मितीचे उद्दिष्टपूर्ती होत नाही तोच शासनाने सार्वजनिक शौचालय निर्मितीला प्राधान्य देत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात सार्वजनीक शौचालय निर्मिती करण्यात आली.

सदर बांधकामासाठी १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के शासन निधी अंतर्गत जवळपास २ लक्ष रु.चा निधी उपलब्ध करण्यात आला.

सदर निधी खर्चून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम देखील करण्यात आले.मात्र बांधकाम होऊन वर्षदेखील लोटत नाही तोच तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा झाल्याचे चित्र आहे.अनेक गावातील शौचालयाच्या इमारतीच्या साहित्याची नासधूस झाल्याची ओरड आहे.

तालुल्यातील अनेक सार्वजनिक इमारतीचे दरवाजे,शौचास बैठक पात्र,हात धुण्याचे पात्र यासह अन्य साहित्याची तोडफोड झाल्याची चर्चा आहे.यासबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला असतांना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.

दरम्यान, बांधकाम पुर्ण होताच शासन निधीची तात्काळ उचल होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे.मात्र सदर निधीची उचल होतांना देखभालीचे काय असा सवाल देखील सर्वत्र केला जात आहे. एकंदरीत लक्षावधी रु.चा निधी खर्चून गावागावात शासनाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत शौचालयाचे बांधकाम झाले खरे.मात्र शासन प्रशासनाचे दुर्लक्ष व स्थानिक नागरिकांच्या असहकार धोरणामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडाल्याची ओरड आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शासन पुरस्कृत या लोकोपयोगी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.