शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

धान्य विक्रीसाठी नोंदणीची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के ...

यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे. वेळेवर सातबारा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा रोष तलाठी कार्यालयावर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे शेतकऱ्यांनी सातबारा वेळेवर मिळत नाही म्हणून एका महिला तलाठ्याला तलाठी कार्यालयाला कुलूप लावून जेरबंद केल्याची घटना घडली. हे असे प्रकार एकट्या साकोली तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अनेक गावांत घडत आहेत. तांत्रिकदृष्ट्या अडचणीच्या असलेल्या या सातबारा उताऱ्यामुळे तलाठी हतबल झालेले आहेत, मात्र प्रशासनाकडून अशा कुठल्या सूचना आलेल्या नाही ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकाची नोंदणी करता येत नाही, त्या शेतकऱ्यांची नोंदणी तलाठ्यांनी करावी. त्यामुळे शेतकरी व तलाठी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत. हा आदेश यावर्षीचाच असून यात थोडीशी शिथिलता द्यावी. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन पीक नोंदणी झाली नाही त्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी तलाठ्यांनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, तर जुन्याच पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावे व शासकीय धान्य खरेदी केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली नोंदणीची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवा

धान खरेदी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना नोंदणीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. मात्र बरेच धान खरेदी केंद्रावर केंद्रचालकांच्या जवळच्या माणसांची आधीच नोंदणी केलेली असते. परिणामी शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.