शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:35 IST

मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, ......

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, युवकांचे सरकारद्वारा नवनवीन कायदे निर्माण करून शोषण करीत आहे. तेव्हा सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरून समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने काम करा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, सभापती नरेश डहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटेल म्हणाले, सध्याचे सरकार हे देशात आर्थिक संकट निर्माण करीत आहे. विरोधक प्रफुल पटेलांविषयी अपप्रचार करून कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करीत आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हे जनता समस्याग्रस्त असताना केवळ पळपुटपणाचे धोरण अवलंबत आहे. तेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकातून त्यांना धडा शिकवा, मी नेहमीच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचे खा.पटेल यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महिला पदाधिकाºयांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी तर आभारप्रदर्शन अभिषेक कारेमोरे यांनी केले.या बैठकीत अ‍ॅड.विनयमोहन पशिने, विजय डेकाटे, डॉ.श्रीकांत वैरागडे, लोमेश वैद्य, कल्याणी भुरे, नितीन तुमाने, धनेंद्र तुरकर, वासुदेव बांते, उर्मिला आगाशे, शुभांगी राहांगडाले, विठ्ठल कहालकर, दामाजी खंडाईत, मधुकर सांभारे, देवचंद ठाकरे, स्वप्नील नशिने, दिपक चिमणकर, अविनाश ब्राम्हणकर, तोमेश्वर पंचभाई, मकसुद पटेल, हितेश सेलोकर, डॉं.विकास गभणे, शैलेश मयूर, अंगराज समरीत, रेखा ठाकरे, रिता हलमारे, संजय केवट, भगीरथ धोटे, सुनिल शहारे, उत्तम कळपते गीता माटे जि.प. सदस्य, सुनिल घोगरे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगनजुडे, दिपक चिमणकर, ज्योती खवास, लोमेश वैद्य, अमर उजवणे, राजू पटेल, उमेश तुरकर, बाबूराव मते, यादोराव भोगे, मुकेश बावनकर, दिलीप सोनवाने, ज्योती टेंभुर्णे, उर्मिला आगाशे, धनू व्यास, सुरेश बघेल, किशोर चौधरी, उमेश ठाकरे, रामभाऊ गाजीमवार, बाबा सय्यजादा, सुनिल घोगरे, मोहन डोरले, विनोद बाभरे, शुभांगी खोब्रागडे, सुनिलसाखरकर, प्रभाकर सपाटे, जुमलाताई बोरकर न.प. सदस्य, प्रेरणा तुरकर, मधुकर चौधरी, सुरेश सावरबांधे, मदन रामटेके, छोटू बाळबुधे, अक्षय रामटेके, सुरेश कापगते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.