शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : तर विद्यार्थ्यांना आहाराची प्रतीक्षा, शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : इयत्ता पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न दिले जाते. मात्र लॉकडाऊन काळात गत तीन महिन्यांपासून शाळांमध्ये ठेवलेले किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी एक्स्पायरी झाल्यानंतर सदर साहित्य कुठल्या कामाचे राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.शाळेत जानेवारी व फेब्रुवारीपासून किराणा साहित्यही आले होते. यात तेल, मसाले, मीठ, हळद, तिखट याचे पॅकेट अजूनही तिथेच ठेवले आहेत. या साहित्यांच्या विनियोगाबाबत शासनाने कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. पॅकेट बंद असलेल्या या उत्पादनाची वैधता किमान सहा महिन्यापर्यंत असते. काही साहित्य एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकते.शाळांमध्ये किराणा साहित्याअंतर्गत खाद्यतेलही देण्यात आले होते. त्यात एक किलो सोयाबीन तेलाचे पॅकेट आहेत. काही कालावधीनंतर तिखट, हळद आदींची पॅकेट निकृष्ट होणार यात शंका नाही. भरपूर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याचा स्टॉक पडून आहे.विद्यमान स्थितीत शाळा सुरु झाल्या नसल्याने या साहित्यांचा वापर होणार नाही. अशा स्थितीत सदर किराणा साहित्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने उंदिर, घूस यांच्या शिरकावानेही सदर साहित्यांची नासधूस तर झाली नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या साहित्यांचा योग्य वेळी वापर होणेही महत्वाचे आहे.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळांमधून कच्चे अन्न, धान्य, कडधान्य पुरविले जाणार असल्याबद्दलचे पत्रक काढण्यात आले होते. परंतु शाळांना अद्यापही धान्याचा पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. मोफत पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जात आहे. अशा स्थितीत अन्नधान्यही गरजू विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जाणे गरजेचे आहे.किंबहुना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत बोलावून फिजीकल डिस्टन्सिंगचा व अन्य नियमांचा वापर करून साहित्य वाटप करणे गरजेचे आहे. त्यामुळे किराणा साहित्यांचा अपव्यय होणार नाही, असा सूरही शिक्षकांसह पालकगण व्यक्त करीत आहेत.लाखनी तालुक्यात १३३ शाळाजिल्हा शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३३ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक वर्गवारी अंतर्गत शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. जवळपास १२ हजार ३१५ विद्यार्थ्यांना शाळांमधून दुपारचे भोजन देण्यात येते. २६ जून पासून शाळा सुरु होणार होती. परंतु सद्यस्थितीत शिक्षकांचीच शाळा भरत आहे. कोरोना संकटकाळात शाळा केव्हा उघडणार याचीही नेमकी शाश्वती नाही. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षण विभागाने पत्रक काढून शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र रुग्णसंख्या वाढीनंतर शाळा सुरु करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळांमध्ये ठेवलेल्या किराणा साहित्याचा उपयोग होण्याची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा