शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

शाळांमधील किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : तर विद्यार्थ्यांना आहाराची प्रतीक्षा, शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : इयत्ता पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न दिले जाते. मात्र लॉकडाऊन काळात गत तीन महिन्यांपासून शाळांमध्ये ठेवलेले किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी एक्स्पायरी झाल्यानंतर सदर साहित्य कुठल्या कामाचे राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.शाळेत जानेवारी व फेब्रुवारीपासून किराणा साहित्यही आले होते. यात तेल, मसाले, मीठ, हळद, तिखट याचे पॅकेट अजूनही तिथेच ठेवले आहेत. या साहित्यांच्या विनियोगाबाबत शासनाने कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. पॅकेट बंद असलेल्या या उत्पादनाची वैधता किमान सहा महिन्यापर्यंत असते. काही साहित्य एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकते.शाळांमध्ये किराणा साहित्याअंतर्गत खाद्यतेलही देण्यात आले होते. त्यात एक किलो सोयाबीन तेलाचे पॅकेट आहेत. काही कालावधीनंतर तिखट, हळद आदींची पॅकेट निकृष्ट होणार यात शंका नाही. भरपूर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याचा स्टॉक पडून आहे.विद्यमान स्थितीत शाळा सुरु झाल्या नसल्याने या साहित्यांचा वापर होणार नाही. अशा स्थितीत सदर किराणा साहित्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने उंदिर, घूस यांच्या शिरकावानेही सदर साहित्यांची नासधूस तर झाली नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या साहित्यांचा योग्य वेळी वापर होणेही महत्वाचे आहे.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळांमधून कच्चे अन्न, धान्य, कडधान्य पुरविले जाणार असल्याबद्दलचे पत्रक काढण्यात आले होते. परंतु शाळांना अद्यापही धान्याचा पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. मोफत पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जात आहे. अशा स्थितीत अन्नधान्यही गरजू विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जाणे गरजेचे आहे.किंबहुना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत बोलावून फिजीकल डिस्टन्सिंगचा व अन्य नियमांचा वापर करून साहित्य वाटप करणे गरजेचे आहे. त्यामुळे किराणा साहित्यांचा अपव्यय होणार नाही, असा सूरही शिक्षकांसह पालकगण व्यक्त करीत आहेत.लाखनी तालुक्यात १३३ शाळाजिल्हा शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३३ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक वर्गवारी अंतर्गत शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. जवळपास १२ हजार ३१५ विद्यार्थ्यांना शाळांमधून दुपारचे भोजन देण्यात येते. २६ जून पासून शाळा सुरु होणार होती. परंतु सद्यस्थितीत शिक्षकांचीच शाळा भरत आहे. कोरोना संकटकाळात शाळा केव्हा उघडणार याचीही नेमकी शाश्वती नाही. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षण विभागाने पत्रक काढून शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र रुग्णसंख्या वाढीनंतर शाळा सुरु करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळांमध्ये ठेवलेल्या किराणा साहित्याचा उपयोग होण्याची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा