शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

शाळांमधील किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : तर विद्यार्थ्यांना आहाराची प्रतीक्षा, शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : इयत्ता पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न दिले जाते. मात्र लॉकडाऊन काळात गत तीन महिन्यांपासून शाळांमध्ये ठेवलेले किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी एक्स्पायरी झाल्यानंतर सदर साहित्य कुठल्या कामाचे राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.शाळेत जानेवारी व फेब्रुवारीपासून किराणा साहित्यही आले होते. यात तेल, मसाले, मीठ, हळद, तिखट याचे पॅकेट अजूनही तिथेच ठेवले आहेत. या साहित्यांच्या विनियोगाबाबत शासनाने कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. पॅकेट बंद असलेल्या या उत्पादनाची वैधता किमान सहा महिन्यापर्यंत असते. काही साहित्य एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकते.शाळांमध्ये किराणा साहित्याअंतर्गत खाद्यतेलही देण्यात आले होते. त्यात एक किलो सोयाबीन तेलाचे पॅकेट आहेत. काही कालावधीनंतर तिखट, हळद आदींची पॅकेट निकृष्ट होणार यात शंका नाही. भरपूर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याचा स्टॉक पडून आहे.विद्यमान स्थितीत शाळा सुरु झाल्या नसल्याने या साहित्यांचा वापर होणार नाही. अशा स्थितीत सदर किराणा साहित्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने उंदिर, घूस यांच्या शिरकावानेही सदर साहित्यांची नासधूस तर झाली नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या साहित्यांचा योग्य वेळी वापर होणेही महत्वाचे आहे.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळांमधून कच्चे अन्न, धान्य, कडधान्य पुरविले जाणार असल्याबद्दलचे पत्रक काढण्यात आले होते. परंतु शाळांना अद्यापही धान्याचा पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. मोफत पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जात आहे. अशा स्थितीत अन्नधान्यही गरजू विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जाणे गरजेचे आहे.किंबहुना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत बोलावून फिजीकल डिस्टन्सिंगचा व अन्य नियमांचा वापर करून साहित्य वाटप करणे गरजेचे आहे. त्यामुळे किराणा साहित्यांचा अपव्यय होणार नाही, असा सूरही शिक्षकांसह पालकगण व्यक्त करीत आहेत.लाखनी तालुक्यात १३३ शाळाजिल्हा शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३३ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक वर्गवारी अंतर्गत शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. जवळपास १२ हजार ३१५ विद्यार्थ्यांना शाळांमधून दुपारचे भोजन देण्यात येते. २६ जून पासून शाळा सुरु होणार होती. परंतु सद्यस्थितीत शिक्षकांचीच शाळा भरत आहे. कोरोना संकटकाळात शाळा केव्हा उघडणार याचीही नेमकी शाश्वती नाही. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षण विभागाने पत्रक काढून शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र रुग्णसंख्या वाढीनंतर शाळा सुरु करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळांमध्ये ठेवलेल्या किराणा साहित्याचा उपयोग होण्याची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा