शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान सरकार उद्योगपती व व्यापाऱ्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:55 IST

भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मासळ येथे जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी जनजागृती मेळावा व एटीएमचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. सद्याच्या सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद केली. अनेकदा या सरकारला याविषयी माहिती देऊन शिष्यवृत्ती सुरु करण्याची मागणी देखील केली. मात्र सध्याची सरकार ही गोरगरिबांची सरकार नसून ही मोठे उद्योगपती व व्यापाºयांची सरकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तालुक्यातील मासळ येथे रविवारला भंडारा जिल्हा बँकेच्या वतीने एटीएमचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विलास श्रूंगारपवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, इंजी.सुरेश ब्राम्हणकर, मनोहर महावाडे, जिल्हा प.सदस्या शुद्धमता नंदागवळी, सरपंचा सवीता लेदे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, सत्यवान हुकरे, सदाशीव वलथरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये यांनी भाजप सरकारने ओबीसी समाज आणि बहुजन समाजाचे पार वाटोळे केले आहे. या सरकारने घोषणा केली की, दरवर्षी २ कोटी नोकºया उपलब्ध करुन देणार, परंतु प्रत्यक्षात मात्र यांची पाटी कोरीच राहीली आहे. ओबीसी समाजाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्याने ओबीसी समाज व बहुजन समाजाच्या लढा लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचत, आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर असून शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. एटीमचे उद्घाटन करण्यासाठी एकत्रीत आलो असलो तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. या परिसरातील शेतकरी हा कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाने पार खचला आहे. ज्याच्या खिशातच पैसे नसतील तर एटीएम मधून पैसे कुठून काढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. संचालन निशाद लांजेवार यांनी तर, आभार उदय भैय्या यांनी केले. कार्यक्रमासाठी राकाँ तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, सरपंच उत्तम भागडकर, रतीराम मेंढे, छगण गोंडाणे, देवा राऊत, सुभाष खीलवानी यांनी सहकार्य केले.