शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विद्यमान सरकार उद्योगपती व व्यापाऱ्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:55 IST

भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मासळ येथे जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी जनजागृती मेळावा व एटीएमचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. सद्याच्या सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद केली. अनेकदा या सरकारला याविषयी माहिती देऊन शिष्यवृत्ती सुरु करण्याची मागणी देखील केली. मात्र सध्याची सरकार ही गोरगरिबांची सरकार नसून ही मोठे उद्योगपती व व्यापाºयांची सरकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तालुक्यातील मासळ येथे रविवारला भंडारा जिल्हा बँकेच्या वतीने एटीएमचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विलास श्रूंगारपवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, इंजी.सुरेश ब्राम्हणकर, मनोहर महावाडे, जिल्हा प.सदस्या शुद्धमता नंदागवळी, सरपंचा सवीता लेदे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, सत्यवान हुकरे, सदाशीव वलथरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये यांनी भाजप सरकारने ओबीसी समाज आणि बहुजन समाजाचे पार वाटोळे केले आहे. या सरकारने घोषणा केली की, दरवर्षी २ कोटी नोकºया उपलब्ध करुन देणार, परंतु प्रत्यक्षात मात्र यांची पाटी कोरीच राहीली आहे. ओबीसी समाजाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्याने ओबीसी समाज व बहुजन समाजाच्या लढा लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचत, आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर असून शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. एटीमचे उद्घाटन करण्यासाठी एकत्रीत आलो असलो तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. या परिसरातील शेतकरी हा कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाने पार खचला आहे. ज्याच्या खिशातच पैसे नसतील तर एटीएम मधून पैसे कुठून काढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. संचालन निशाद लांजेवार यांनी तर, आभार उदय भैय्या यांनी केले. कार्यक्रमासाठी राकाँ तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, सरपंच उत्तम भागडकर, रतीराम मेंढे, छगण गोंडाणे, देवा राऊत, सुभाष खीलवानी यांनी सहकार्य केले.