शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बेसुमार उत्खनन, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल; रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 13:10 IST

बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

भंडारा : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या रेतीव्यवसायात अनेक माफियांचा शिरकाव झाला असून कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून रेतीचे बेसुमार उत्खनन केले जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीघाटांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे या घाटांवर तस्करांचा ताबा आहे. अहोरात्र उत्खनन करून नागपूर आणि मध्य प्रदेशात रेतीची वाहतूक केली जाते. या व्यवसायात काही पक्षांचे कार्यकर्ते रेती तस्करीत उतरले आहेत. शेकडो ब्रास रेतीचे चोरटे उत्खनन केले जाते.

रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढले आहे. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे १५ ते २० तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. गत महिनाभरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा वचपा म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. लाखनी तालुक्यातील झरप येथे शनिवारी लाठ्याकाठ्या घेऊन रेती तस्कर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या मागे लागले होते. सुदैवाने यात दुखापत झाली नाही.

रेती तस्करांचे मोठे नेटवर्क

रेती तस्करांनी स्थानिक तरुण व महसूल विभागातील कार्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठे नेटवर्क तयार केले आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कोणत्या घटाकडे जात आहे याची तत्काळ माहिती रेती तस्करांना मिळते. त्यामुळे कुणी अधिकारी प्रामाणिकपणे कारवाईसाठी गेला तर रेती तस्कर पसार झालेले असतात. जिल्ह्यातील रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुचाकीस्वार अहोरात्र ठिय्या देऊन असतात. रेतीचे वाहन पकडले तर काही वेळातच ही मंडळी तेथे गोळा होतात. हातात लाठ्याकाठ्या असतात. पथकावर दबाव टाकतात. २० ते २५ संख्येने असलेल्या या टोळक्यापुढे काहीच चालत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा