शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

बेसुमार उत्खनन, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल; रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 13:10 IST

बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

भंडारा : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या रेतीव्यवसायात अनेक माफियांचा शिरकाव झाला असून कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून रेतीचे बेसुमार उत्खनन केले जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीघाटांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे या घाटांवर तस्करांचा ताबा आहे. अहोरात्र उत्खनन करून नागपूर आणि मध्य प्रदेशात रेतीची वाहतूक केली जाते. या व्यवसायात काही पक्षांचे कार्यकर्ते रेती तस्करीत उतरले आहेत. शेकडो ब्रास रेतीचे चोरटे उत्खनन केले जाते.

रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढले आहे. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे १५ ते २० तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. गत महिनाभरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा वचपा म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. लाखनी तालुक्यातील झरप येथे शनिवारी लाठ्याकाठ्या घेऊन रेती तस्कर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या मागे लागले होते. सुदैवाने यात दुखापत झाली नाही.

रेती तस्करांचे मोठे नेटवर्क

रेती तस्करांनी स्थानिक तरुण व महसूल विभागातील कार्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठे नेटवर्क तयार केले आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कोणत्या घटाकडे जात आहे याची तत्काळ माहिती रेती तस्करांना मिळते. त्यामुळे कुणी अधिकारी प्रामाणिकपणे कारवाईसाठी गेला तर रेती तस्कर पसार झालेले असतात. जिल्ह्यातील रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुचाकीस्वार अहोरात्र ठिय्या देऊन असतात. रेतीचे वाहन पकडले तर काही वेळातच ही मंडळी तेथे गोळा होतात. हातात लाठ्याकाठ्या असतात. पथकावर दबाव टाकतात. २० ते २५ संख्येने असलेल्या या टोळक्यापुढे काहीच चालत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा