शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव होऊनही रेतीघाट बंद

By admin | Updated: June 7, 2014 23:46 IST

उन्हाळा सुरू होताच शासन स्तरावर रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील पाच रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण झाले असताना पावसाळा तोंडावर आला मात्र उत्खननाची परवानगी मिळाली नाही.

लाखांदूर रेतीघाट : ‘ते’ रेतीघाट पावसाळ्यात सुरू होणार का?लाखांदूर : उन्हाळा सुरू होताच शासन स्तरावर रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील पाच रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण झाले असताना पावसाळा तोंडावर आला मात्र उत्खननाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कामे रेंगाळली असून पावसाळ्यात रेतीघाट सुरू होणार का असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केली आहे.तालुक्यात वैनगंगा व चुलबंद नदीमुळे गौण खनिजाचे अमाप साठे आहेत. यात मुख्यत्वे शेतीला जिल्ह्याबाहेर मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. शासकीय नियमाप्रमाणे उन्हाळ्याची सुरवात होताच. वर्तमान पत्रात जाहिरात प्रकाशित करून लिलाव प्रक्रिया जलदगतीने पार पडली. यात तालुक्यातील दिघोरी, आथली, बोथली, आसोला, इटान रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण करून अनामत रक्कमसुद्धा शासकीय खजिन्यात भरण्यात आली. आज ना उद्या रेती उपसा करण्यासाठी परवानगी मिळेल म्हणून कंत्राटदार चातकासारखे वाट पाहत होते. परंतु, पावसाळा जवळ आला असताना उत्खननाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे एकूणच शासनाने व प्रशासनाने फसवणूक केल्याचे बोलले जाते. तालुक्यात अनेक विकास कामे मंजूर झाली. यासाठी रेतीची मागणी मोठय़ा प्रमाणात त्यामुळे नाईलाजास्तव कंत्राटदारांना चोरीचा मार्ग अवलंबवावा लागला. एकूणच चोरी करण्यासाठी प्रशासनानेच प्रवृत्त केल्याचाही आरोप कंत्राटदारांनी केला. रेतीची चोरी झाली नसती तर तालुक्यातील विकास कामे खुटले असते. शासकीय योजना निष्फळ ठरल्या असत्या. यावेळी महसूल विभागाने अधिकाराचा वापर करून रेती चोरीचे ट्रॅक्टरवर थातूरमातूर कार्यवाही करून मार्ग मोकडा केला. यावर्षी तालुक्यातील रेतीघाटातील रेती उपसा करण्यासाठी परवानगी न दिल्याने मात्र, रेतीची चोरी झाल्याने शासकीय तिजोरीला चुना लागला. प्रशासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करीत आहेत.अवैध रेती उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने दंडात्मक कार्यवाहीतून लाखोचा महसूल जमा केला. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने रेतीघाट सुरू करण्याचे सौजन्य न दाखविता तलाठी मंडळ अधिकारी, पोलीस यांच्या चमू तयार करून रात्रीला गस्त लावून अवैध रेती उपसा करणार्‍यांवर कार्यवाही करण्यासाठी कंबर कसली. परंतु ही मोहीमसुद्धा निष्प्रभ ठरली. आजही तालुक्यात रेती उपसा होतच आहे. दंडात्मक रक्कम भरणे सुरूच आहे. रेती उपसा करण्यासाठी प्रशासन व अधिकार्‍यांकडून का प्रयत्न केले जात नाही. पाणी कुठे मुरत आहे हे समजण्यास मार्ग नाही. पावसाळा काही दिवसावर आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत पास झालेले रेतीघाट पावसाळ्यात सुरू होणार का, असा प्रतिप्रश्न कंत्राटदारांकडून विचारला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)