शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील कामकाज विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:30 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्छा रिकाम्या : निवडणुकीमुळे दैनंदिन कामकाजाला ब्रेक

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा दिवाळी उत्सवाच्या काळात विधानसभेची निवडणूक आली. त्यामुळे अनेकांच्या कामकाजाची धावपळ वाढली. त्यातच दिवाळीनिमित्ताने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या गावाची वाट धरत निघून गेले. आता दिवाळीचा सण आटोपल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून नियमित कामकाजाला सुरुवात होईल, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. परंतु, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील बहुतांश खुर्चा रिकाम्या पाहावयास मिळाल्या. काहीजण सुट्टयांवर तर काही निवडणुकीच्या कामावर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेत दिवाळी फीवर अद्यापही कायम आहे. दिवाळीला गुरुवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी लक्ष्मीपूजन, शनिवारी गायगोधन आणि रविवारी भाऊबीज होती. त्यामुळे रविवारपर्यंत सुट्टया झाल्यानंतर ४ नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे कार्यालये सुरू झाली. सलग सुट्टया आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांचा आठवडाभराचा बेत आखला. ते गुरुवारपासून सुट्टीवर गेले असून, अद्यापही कार्यालयात परतले नाहीत. त्यामुळे मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत शुकशुकाट दिसून आला. हीच परिस्थिती अन्य शासकीय कार्यालयांतही होती. 

निवडणुकीच्या कामानिमित्त अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर असल्याचेही सांगण्यात आले. तर काही जणांची निवडणूक कामात ड्यूटी लवकरच लागणार असल्याचे कळविण्यात आले.

कामकाज नावापुरेतच, गप्पाच अधिक दिवाळीसाठी गेलेले अधिकारी य कर्मचारी सुट्ट्या संपवून परतले नाहीत. त्यातच निवडणुकांमुळे अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. परिणामी सर्वसामान्यांचे कामकाज विस्कळीत झाले. जे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले, त्यातील मोजक्याच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. काहीजण गप्पागोष्टीत गुंग होते. काही मोबाइलवर व्यस्त होते, तर काही परिसरात बाहेरील टपरीवर वेळ घालवत असल्याचे दिसले.

कामानिमित्ताने आलेले गेले परत शनिवार व रविवार असल्याने काही अधिकारी व कर्मचारी त्या अगोदरच म्हणजे गुरुवारपासूनच सुट्टीवर गेले. त्यामुळे सोमवारी या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तरी कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. मंगळवारी विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयांत नागरिक आलेले दिसून आले. पण, कामे न झाल्याने सायंकाळी निराश होऊन परत गेले.

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी घालावे लक्षजिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची आहे. मंगळवारला कामकाज सुरु असताना अनेकांच्या खुर्चा रिकाम्या दिसल्या. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी खरंच निवडणुकीच्या कामावर आहेत, की सुट्टयांवर यासंबंधीची पाहणी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा