शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पाऊस बरसला तरीही दुष्काळातून सुटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:15 IST

तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपऱ्हे निकामी : जिल्ह्यात केवळ आठ टक्के क्षेत्रात भात रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल एक लाख ६७ हजार ४८५ हेक्टरवरील पेरणी रखडली आहे. या पेरणीसाठी आता शेतकऱ्यांकडे पऱ्हेच नसल्याची माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी मशागत केली. पºह्यांसाठी नर्सरी तयार केली. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नर्सरीतील पऱ्हे वाचविण्याची शेतकºयांची धडपड सुरू झाली. कुणी गुंड भरण्याने तर कुणी ट्रॅक्टरने पाणी आणून पऱ्हे वाचवित होते. परंतु तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत होते. परिणामी शेतातील पऱ्हे निकामी झाले. आता गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांजवळ असलेले पºहे रोवणीलायक राहिलेच नाही.भंडारा जिल्ह्यात लागवडलायक क्षेत्र दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. त्यात एकट्या भाताचे क्षेत्र एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार ८४४ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. भातक्षेत्राच्या केवळ आठ टक्केच रोवणी आटोपली. पावसाअभावी संपूर्ण कामे ठप्प झाली होती. आता पाऊस बरसत असला तरी या पावसाचा फायदा शेतकऱ्यांवर होण्याची आशा दिसत नाही. आज पाऊस १५ दिवस आधी बरसला असता तर रोवणीची कामे झाली असती. परंतु पावसाने दडी मारली आणि शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला.२४ तासात ४३ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे गुरूवार दुपारपासून आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारा तालुक्यात ४७ मिमी, मोहाडी ६८.३ मिमी, तुमसर ४३ मिमी, पवनी ४०.२ मिमी, साकोली ३०.६ मिमी, लाखांदूर ३०.६ मिमी, लाखनी ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली.शेतीत लगबग वाढलीपावसाला प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेताकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. शेतशिवार मजुरांनी गजबजल्याचे दिसत होते.उकाड्यातून सुटकागत तीन आठवड्यापासून उकाड्याचा असाह्य त्रास सहन करणाºया नागरिकांची दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे सुटका झाली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत असल्याने जीव कासावीस होत होता. अनेकांनी काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू केले होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती