शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस बरसला तरीही दुष्काळातून सुटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:15 IST

तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपऱ्हे निकामी : जिल्ह्यात केवळ आठ टक्के क्षेत्रात भात रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल एक लाख ६७ हजार ४८५ हेक्टरवरील पेरणी रखडली आहे. या पेरणीसाठी आता शेतकऱ्यांकडे पऱ्हेच नसल्याची माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी मशागत केली. पºह्यांसाठी नर्सरी तयार केली. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नर्सरीतील पऱ्हे वाचविण्याची शेतकºयांची धडपड सुरू झाली. कुणी गुंड भरण्याने तर कुणी ट्रॅक्टरने पाणी आणून पऱ्हे वाचवित होते. परंतु तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत होते. परिणामी शेतातील पऱ्हे निकामी झाले. आता गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांजवळ असलेले पºहे रोवणीलायक राहिलेच नाही.भंडारा जिल्ह्यात लागवडलायक क्षेत्र दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. त्यात एकट्या भाताचे क्षेत्र एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार ८४४ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. भातक्षेत्राच्या केवळ आठ टक्केच रोवणी आटोपली. पावसाअभावी संपूर्ण कामे ठप्प झाली होती. आता पाऊस बरसत असला तरी या पावसाचा फायदा शेतकऱ्यांवर होण्याची आशा दिसत नाही. आज पाऊस १५ दिवस आधी बरसला असता तर रोवणीची कामे झाली असती. परंतु पावसाने दडी मारली आणि शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला.२४ तासात ४३ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे गुरूवार दुपारपासून आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारा तालुक्यात ४७ मिमी, मोहाडी ६८.३ मिमी, तुमसर ४३ मिमी, पवनी ४०.२ मिमी, साकोली ३०.६ मिमी, लाखांदूर ३०.६ मिमी, लाखनी ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली.शेतीत लगबग वाढलीपावसाला प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेताकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. शेतशिवार मजुरांनी गजबजल्याचे दिसत होते.उकाड्यातून सुटकागत तीन आठवड्यापासून उकाड्याचा असाह्य त्रास सहन करणाºया नागरिकांची दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे सुटका झाली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत असल्याने जीव कासावीस होत होता. अनेकांनी काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू केले होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती