शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पाऊस बरसला तरीही दुष्काळातून सुटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:15 IST

तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपऱ्हे निकामी : जिल्ह्यात केवळ आठ टक्के क्षेत्रात भात रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल एक लाख ६७ हजार ४८५ हेक्टरवरील पेरणी रखडली आहे. या पेरणीसाठी आता शेतकऱ्यांकडे पऱ्हेच नसल्याची माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी मशागत केली. पºह्यांसाठी नर्सरी तयार केली. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नर्सरीतील पऱ्हे वाचविण्याची शेतकºयांची धडपड सुरू झाली. कुणी गुंड भरण्याने तर कुणी ट्रॅक्टरने पाणी आणून पऱ्हे वाचवित होते. परंतु तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत होते. परिणामी शेतातील पऱ्हे निकामी झाले. आता गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांजवळ असलेले पºहे रोवणीलायक राहिलेच नाही.भंडारा जिल्ह्यात लागवडलायक क्षेत्र दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. त्यात एकट्या भाताचे क्षेत्र एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार ८४४ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. भातक्षेत्राच्या केवळ आठ टक्केच रोवणी आटोपली. पावसाअभावी संपूर्ण कामे ठप्प झाली होती. आता पाऊस बरसत असला तरी या पावसाचा फायदा शेतकऱ्यांवर होण्याची आशा दिसत नाही. आज पाऊस १५ दिवस आधी बरसला असता तर रोवणीची कामे झाली असती. परंतु पावसाने दडी मारली आणि शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला.२४ तासात ४३ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे गुरूवार दुपारपासून आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारा तालुक्यात ४७ मिमी, मोहाडी ६८.३ मिमी, तुमसर ४३ मिमी, पवनी ४०.२ मिमी, साकोली ३०.६ मिमी, लाखांदूर ३०.६ मिमी, लाखनी ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली.शेतीत लगबग वाढलीपावसाला प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेताकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. शेतशिवार मजुरांनी गजबजल्याचे दिसत होते.उकाड्यातून सुटकागत तीन आठवड्यापासून उकाड्याचा असाह्य त्रास सहन करणाºया नागरिकांची दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे सुटका झाली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत असल्याने जीव कासावीस होत होता. अनेकांनी काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू केले होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती