शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

यंदाही शेतकरी संकटातून बाहेर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत.

ठळक मुद्देअतीपावसामुळे धान पिकांची नासाडी : सर्वेक्षण करून नुकसानभरपाईची सरपंचांसह शेतकऱ्यांची मागणी

तुलसीदास रावते ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत, परंतु सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी सुरू आहे. पीक घरी येऊ शकत नाही या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. तातडीने पंचनामे करून पीक विमा व आर्थिक मदत देण्यात यावे , अशी मागणी तुमसर तालुक्यातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत. परंतु पावसामुळे पिकाची कापणी करू शकत नाही, तर काही धानपीक अती पावसामुळे जमीनदोस्त झाले असून कुजण्याच्या स्थितीत आहेत.उच्च प्रतीच्या धानपिकाला कीडींचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. अनेक शेतकºयांचे धानपीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. पीक घरी येणार की नाही, या विवेचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. हे सर्व सततच्या पावसामुळे झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी बँक, सावकार, हातउसने कुठून ना कुठून कर्ज काढून शेती सजविली आहे. शेतकºयांच्या डोक्यावर मोठे कर्जाचे ओझे असून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावे तर काही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नाही, परंतु नुकसान झाली आहे, अशा सर्व शेतकºयांच्या पिकाची पाहणी करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी तुमसर तालुक्यातील बघेडाचे सरपंच प्रतिमा अशोक ठाकूर, पवनाराचे सरपंच रशीद शेख, चिचोलीचे सरपंच अनिता नेवारे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या धानपिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढकाराची गरज आहे.कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटकाभंडारा : तालुक्यातील कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला असून धानाच्या बांधीत सतत पाणी साचून राहिल्याने धानपीक सडत आहे. सर्वाधिक फटका शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा बसला. शासनाने सर्वेक्षण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी एका निवेदनातून केली आहे. कोथुर्णा परिसरातील लावेश्वर, खमाटा, टाकळी, कोथुर्णा, दाभा, खैरी, सोनुली, इंदूरखा, सिरसी आदी गावात गत महिनाभरापासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच शनिवारी रात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. यामुळे संपूर्ण धानपीक उध्वस्त झाले. धानाच्या ओंब्या गळल्या असून पावसाने पीक सडू लागले आहे. याप्रकरणी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी महेश जगनाडे, संजय मते, पंकेश काळे, राजकुमार उताने, सरपंच मधुकर भोपे, विजय ईश्वरकर, विलास खांदाडे, रसिका मोहतुरे, प्रमोद चोपकर, प्रवीण वाघमारे, रामकृष्ण मेश्राम, रामचंद्र डोये, सुखदेव तिवाडे, अशोक भोयर, कमल साठवणे, राधेश्याम भोयर यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी