शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

यंदाही शेतकरी संकटातून बाहेर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत.

ठळक मुद्देअतीपावसामुळे धान पिकांची नासाडी : सर्वेक्षण करून नुकसानभरपाईची सरपंचांसह शेतकऱ्यांची मागणी

तुलसीदास रावते ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत, परंतु सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी सुरू आहे. पीक घरी येऊ शकत नाही या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. तातडीने पंचनामे करून पीक विमा व आर्थिक मदत देण्यात यावे , अशी मागणी तुमसर तालुक्यातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून तुमसर तालुक्यात पाऊस बसरत असल्याने धान पीक धोक्यात आहे. किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलक्या प्रतीचे धान कापणी योग्य झाले आहेत. परंतु पावसामुळे पिकाची कापणी करू शकत नाही, तर काही धानपीक अती पावसामुळे जमीनदोस्त झाले असून कुजण्याच्या स्थितीत आहेत.उच्च प्रतीच्या धानपिकाला कीडींचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. अनेक शेतकºयांचे धानपीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. पीक घरी येणार की नाही, या विवेचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे. हे सर्व सततच्या पावसामुळे झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी बँक, सावकार, हातउसने कुठून ना कुठून कर्ज काढून शेती सजविली आहे. शेतकºयांच्या डोक्यावर मोठे कर्जाचे ओझे असून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावे तर काही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नाही, परंतु नुकसान झाली आहे, अशा सर्व शेतकºयांच्या पिकाची पाहणी करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी तुमसर तालुक्यातील बघेडाचे सरपंच प्रतिमा अशोक ठाकूर, पवनाराचे सरपंच रशीद शेख, चिचोलीचे सरपंच अनिता नेवारे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या धानपिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी पुढकाराची गरज आहे.कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटकाभंडारा : तालुक्यातील कोथुर्णा परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला असून धानाच्या बांधीत सतत पाणी साचून राहिल्याने धानपीक सडत आहे. सर्वाधिक फटका शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा बसला. शासनाने सर्वेक्षण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी एका निवेदनातून केली आहे. कोथुर्णा परिसरातील लावेश्वर, खमाटा, टाकळी, कोथुर्णा, दाभा, खैरी, सोनुली, इंदूरखा, सिरसी आदी गावात गत महिनाभरापासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच शनिवारी रात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. यामुळे संपूर्ण धानपीक उध्वस्त झाले. धानाच्या ओंब्या गळल्या असून पावसाने पीक सडू लागले आहे. याप्रकरणी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी महेश जगनाडे, संजय मते, पंकेश काळे, राजकुमार उताने, सरपंच मधुकर भोपे, विजय ईश्वरकर, विलास खांदाडे, रसिका मोहतुरे, प्रमोद चोपकर, प्रवीण वाघमारे, रामकृष्ण मेश्राम, रामचंद्र डोये, सुखदेव तिवाडे, अशोक भोयर, कमल साठवणे, राधेश्याम भोयर यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी