शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

दोन बैठकीनंतरही रस्ता बांधकामाबाबत तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:52 IST

भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देप्रकरण राज्य मार्गाचे : धुळीमुळे बळावला आजाराचा धोका, व्यवसायिकांसह नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.शहरातून जिल्हा परिषद चौक ते खातरोड असे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७-ई चे काम केले जात आहे. सदर महामार्गार्च बांधकाम एचजी इन्फ्रा या कंपनीला १८ महिन्यापूर्वी देण्यात आले. या महामागार्चे अर्धेअधिक काम झाले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी कंपनीने जिल्हा परिषद चौकापासून कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद चौक ते साई मंदिरपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, रस्त्याच्या कामाचा अंतिम डीपीआर नगरपालिकेला विश्वासात घेऊन तयार करण्यात आला नसल्याचा आक्षेप पालिकेने घातला. शहरात होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना, भूयारी गटार योजना, पथदिवे या बांधकामामुळे प्रभावित होत असल्यामुळे हे काम थांबविण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना अर्धवट असलेल्या रस्त्याचा त्रास होत आहे.यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दोनदा बैठक झाली. परंतु, त्यात काहीही फलित निघाले नाही. दुसरीकडे, रस्ता उखडून ठेवल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या मार्गावर काही अपघातही घडले. अखेरीस कंपनीने खोदलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता समतल केला. आता मात्र नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद चौक ते खातरोडवरील केशवनगरपर्यंत हे काम रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व अन्य विभागांमध्ये तिसरी बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत तरी तोडगा निघून महामार्गाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.आराखड्यात दिरंगाईरखडलेल्या महामार्गासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका, उपविभागीय अधिकारी, भूमिअभिलेख विभाग व एचजी इन्फ्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यांची २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर अशा दोनदा बैठका झाल्या. यामध्ये नगर पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बांधकामाबाबत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, १५ दिवसांचा कालावधी होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग बांधकामाचा अंतिम आराखडा तयार करून पालिकेला सादर केला नाही.