शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

दोन बैठकीनंतरही रस्ता बांधकामाबाबत तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:52 IST

भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देप्रकरण राज्य मार्गाचे : धुळीमुळे बळावला आजाराचा धोका, व्यवसायिकांसह नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.शहरातून जिल्हा परिषद चौक ते खातरोड असे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७-ई चे काम केले जात आहे. सदर महामार्गार्च बांधकाम एचजी इन्फ्रा या कंपनीला १८ महिन्यापूर्वी देण्यात आले. या महामागार्चे अर्धेअधिक काम झाले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी कंपनीने जिल्हा परिषद चौकापासून कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद चौक ते साई मंदिरपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, रस्त्याच्या कामाचा अंतिम डीपीआर नगरपालिकेला विश्वासात घेऊन तयार करण्यात आला नसल्याचा आक्षेप पालिकेने घातला. शहरात होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना, भूयारी गटार योजना, पथदिवे या बांधकामामुळे प्रभावित होत असल्यामुळे हे काम थांबविण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना अर्धवट असलेल्या रस्त्याचा त्रास होत आहे.यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दोनदा बैठक झाली. परंतु, त्यात काहीही फलित निघाले नाही. दुसरीकडे, रस्ता उखडून ठेवल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या मार्गावर काही अपघातही घडले. अखेरीस कंपनीने खोदलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता समतल केला. आता मात्र नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद चौक ते खातरोडवरील केशवनगरपर्यंत हे काम रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व अन्य विभागांमध्ये तिसरी बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत तरी तोडगा निघून महामार्गाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.आराखड्यात दिरंगाईरखडलेल्या महामार्गासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका, उपविभागीय अधिकारी, भूमिअभिलेख विभाग व एचजी इन्फ्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यांची २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर अशा दोनदा बैठका झाल्या. यामध्ये नगर पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बांधकामाबाबत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, १५ दिवसांचा कालावधी होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग बांधकामाचा अंतिम आराखडा तयार करून पालिकेला सादर केला नाही.