शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

दोन बैठकीनंतरही रस्ता बांधकामाबाबत तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:52 IST

भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देप्रकरण राज्य मार्गाचे : धुळीमुळे बळावला आजाराचा धोका, व्यवसायिकांसह नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.शहरातून जिल्हा परिषद चौक ते खातरोड असे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७-ई चे काम केले जात आहे. सदर महामार्गार्च बांधकाम एचजी इन्फ्रा या कंपनीला १८ महिन्यापूर्वी देण्यात आले. या महामागार्चे अर्धेअधिक काम झाले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी कंपनीने जिल्हा परिषद चौकापासून कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद चौक ते साई मंदिरपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, रस्त्याच्या कामाचा अंतिम डीपीआर नगरपालिकेला विश्वासात घेऊन तयार करण्यात आला नसल्याचा आक्षेप पालिकेने घातला. शहरात होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना, भूयारी गटार योजना, पथदिवे या बांधकामामुळे प्रभावित होत असल्यामुळे हे काम थांबविण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना अर्धवट असलेल्या रस्त्याचा त्रास होत आहे.यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दोनदा बैठक झाली. परंतु, त्यात काहीही फलित निघाले नाही. दुसरीकडे, रस्ता उखडून ठेवल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या मार्गावर काही अपघातही घडले. अखेरीस कंपनीने खोदलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता समतल केला. आता मात्र नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद चौक ते खातरोडवरील केशवनगरपर्यंत हे काम रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व अन्य विभागांमध्ये तिसरी बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत तरी तोडगा निघून महामार्गाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.आराखड्यात दिरंगाईरखडलेल्या महामार्गासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका, उपविभागीय अधिकारी, भूमिअभिलेख विभाग व एचजी इन्फ्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यांची २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर अशा दोनदा बैठका झाल्या. यामध्ये नगर पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बांधकामाबाबत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, १५ दिवसांचा कालावधी होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग बांधकामाचा अंतिम आराखडा तयार करून पालिकेला सादर केला नाही.