शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

72 तासांत पीक नुकसानीची माहिती देवूनही विमा कंपनीची मदत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स ही विमा कंपनी कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीच्या कार्यालयाला नेहमीच कुलूप असते. कार्यालय उघडे राहतच नसल्याची वस्तुस्थिती आहे. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधूनही टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत पिकांचे नुकसान झाल्याचे कळवले. याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही विमा कंपनीने नुुकसानग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भंडारा जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स ही विमा कंपनी कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीच्या कार्यालयाला नेहमीच कुलूप असते. कार्यालय उघडे राहतच नसल्याची वस्तुस्थिती आहे. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधूनही टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.विमा भरूनही विम्याचा लाभ मिळत नसेल, तर विमा भरायचा कशाला, असा संतप्त सवाल भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तथा भाजपा ग्रामीण तालुका महामंत्री विष्णुदास हटवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या पीकविमा कंपनीवर थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. चिखली येथील शेतकरी जीवन हटवार, तुकाराम गायधने, राकेश गायधने, देवराव मेहर यांनी विमा भरला होता. सर्वांच्या शेतावर पंचनामे झाले, मात्र अजूनही मदत मिळालीच नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत.परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान केले होते. याची कृषी विभागाने तत्काळ दखलही घेतली. पीकपाहणीही केली. मात्र, त्यानंतर विमा कंपनीकडून मदतीसाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आता कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

कृषीमंत्र्यांच्या आदेशाला विमा कंपनीकडून ‘खाे’- राज्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने हा मुद्दा मंत्रालयात उपस्थित केला होता. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्यानंतर केंद्राने विमा कंपनीला हजारो कोटी रुपये दिले. राज्यानेही कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, प्रत्यक्षात विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना फुटकी कवडीही देण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपन्या वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसह शासनाला लुटत आहेत. यासाठी थेट पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

विमा कंपनीचे प्रतिनिधी असतात तरी कुठे?- जिल्ह्यात विमा कंपनीचे प्रतिनिधी कुठेही फिरताना दिसून येत नाहीत. विमा कंपनीचे कार्यालयालाही कुलूप असते. तालुका कृषी कार्यालयातही विचारपूस केल्यानंतर विमा प्रतिनिधींची भेट होत नाही. इतकेच नव्हे तर एकाही गावात कोणत्याही विमा कंपनीचा प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक नाही. याचा उलटा परिणाम कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांचा रोष अनेकदा पत्करावा लागतो. एकीकडे शासनाचे लाखो रुपयांचा निधी विमा कंपनी लाटते तर दुसरीकडे विमा कंपनीची कामे मात्र कृषी विभागाला करावी लागतात ही परिस्थिती कधी बदलणार असा प्रश्न आहे. 

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी