शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

72 तासांत पीक नुकसानीची माहिती देवूनही विमा कंपनीची मदत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स ही विमा कंपनी कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीच्या कार्यालयाला नेहमीच कुलूप असते. कार्यालय उघडे राहतच नसल्याची वस्तुस्थिती आहे. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधूनही टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत पिकांचे नुकसान झाल्याचे कळवले. याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही विमा कंपनीने नुुकसानग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भंडारा जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स ही विमा कंपनी कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीच्या कार्यालयाला नेहमीच कुलूप असते. कार्यालय उघडे राहतच नसल्याची वस्तुस्थिती आहे. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधूनही टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.विमा भरूनही विम्याचा लाभ मिळत नसेल, तर विमा भरायचा कशाला, असा संतप्त सवाल भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तथा भाजपा ग्रामीण तालुका महामंत्री विष्णुदास हटवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या पीकविमा कंपनीवर थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. चिखली येथील शेतकरी जीवन हटवार, तुकाराम गायधने, राकेश गायधने, देवराव मेहर यांनी विमा भरला होता. सर्वांच्या शेतावर पंचनामे झाले, मात्र अजूनही मदत मिळालीच नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत.परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान केले होते. याची कृषी विभागाने तत्काळ दखलही घेतली. पीकपाहणीही केली. मात्र, त्यानंतर विमा कंपनीकडून मदतीसाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आता कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

कृषीमंत्र्यांच्या आदेशाला विमा कंपनीकडून ‘खाे’- राज्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने हा मुद्दा मंत्रालयात उपस्थित केला होता. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्यानंतर केंद्राने विमा कंपनीला हजारो कोटी रुपये दिले. राज्यानेही कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, प्रत्यक्षात विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना फुटकी कवडीही देण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपन्या वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसह शासनाला लुटत आहेत. यासाठी थेट पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

विमा कंपनीचे प्रतिनिधी असतात तरी कुठे?- जिल्ह्यात विमा कंपनीचे प्रतिनिधी कुठेही फिरताना दिसून येत नाहीत. विमा कंपनीचे कार्यालयालाही कुलूप असते. तालुका कृषी कार्यालयातही विचारपूस केल्यानंतर विमा प्रतिनिधींची भेट होत नाही. इतकेच नव्हे तर एकाही गावात कोणत्याही विमा कंपनीचा प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक नाही. याचा उलटा परिणाम कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांचा रोष अनेकदा पत्करावा लागतो. एकीकडे शासनाचे लाखो रुपयांचा निधी विमा कंपनी लाटते तर दुसरीकडे विमा कंपनीची कामे मात्र कृषी विभागाला करावी लागतात ही परिस्थिती कधी बदलणार असा प्रश्न आहे. 

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी