शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

कोरड्या खोलमारा घाटात इटियाडोहच्या पाण्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,०००  मिलिमीटरच्यावर पाऊस कोसळतो. एवढा पाऊस ज्या भूमीत झाला तेथील पाणी पातळी निश्चितच समाधानकारक असते.

मुखरु बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील पावसाचे प्रमाण अधिक असले तरी मार्च महिन्यानंतर नदी नाले कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भंडारा जिल्ह्याला नवीन नाही. नदी काठावरील गावांनासुद्धा लीटरभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही टंचाई दूर करण्याकरिता महत्त्वाकांक्षी जलसाठे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे.पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,०००  मिलिमीटरच्यावर पाऊस कोसळतो. एवढा पाऊस ज्या भूमीत झाला तेथील पाणी पातळी निश्चितच समाधानकारक असते. पावसाळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना टप्प्याटप्प्याने सोडल्यास शेतीसह मुक्या जनावरांनासुद्धा मोठा आधार होतो. चूलबंद नदी घाट संपूर्णतः कोरडे झालेले आहे. गत महिन्याभरापासून चूलबंद खोरे संकटात आहे. सर्वच पिके चूलबंद खोऱ्यात उत्पादित होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेती पंपाच्या माध्यमातून सिंचन सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी संकटात येऊन शेत पिके निश्चितच समस्यात आहेत.भंडारा जिल्ह्यात साकोली शेजारील चूलबंद नदीवर निम्न ूचूलबंद प्रकल्प आहे. त्यातून कित्येक गावांची तहान भागविली जाते. त्या पाण्याचा लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील चुलबंद खोऱ्यातील गावांना होऊ शकतो. कोरड्या पडलेल्या जलवाहिन्या पुनर्जीवित होऊ शकतात. पशू पक्ष्यांसह जनावरांनाही मोठा आधार मिळू शकतो. किमान एप्रिल व मे या महिन्यात निम्न चूलबंदचे व गोसेखुर्द प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन चे पाणी चूलबंद व तिला मिळणाऱ्या नाल्यांना सोडल्यास शेतीसह सर्वांना मोठा दिलासा मिळू शकतो.

चूलबंद नदी काेरडी- चूलबंद नदीला कोरड पडली आहे. अमाप रेती उपसानेही पाणी पातळी खालावलेली आहे. निम्न चूलबंद चे व गोसेखुर्द अंतर्गत नेरला लिफ्टचे पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. जल साठ्यातील पाणी चूलबंदला मिळाल्यास कित्येक गावे उन्हाळ्याच्या दिवसातही पाणीदार होतील हे विशेष!

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प