शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा विकास ठप्प

By admin | Updated: November 16, 2016 00:44 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे.

शेती झाली महाग : ग्रामीण भागातही यंत्राने धान कापणी, महिला शेतमजूरांची कामासाठी भटकंतीजवाहरनगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार. तो ही पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्यांना फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मनुष्यबळाचा, बैलांचा वापर करून शेतातील वखरणी, नांगरणीपासून धान कापणीपर्यंत कामे होत होती. यात शेतकरी, महिला शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या दणकट होता. त्यासोबत योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहेत. शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाच्या उपयोेग करीत कमी कष्टाळू झाली. पूर्वी बैलांच्या मदतीने शेताची वखरणी करण्यासाठी सहा सात दिवस लागायचे. शेताच्या कामावर असणारा पहाटेच शेतात जाऊन वखर जुंपायचा. माळरानावरून शेतकऱ्याची पत्नी हाक मारीत ‘अवं धनी, चटनी भाकर खायला या हो’ अशी सकाळी १०-११ च्या दरम्या आवाज शेतारानात घोंगायचा. आणलेली शिदोरी आपल्या बायकोसोबत सकाळची न्याहारी करायचा. यावेळी बैलालाही थोडा वेळ विश्रांती देऊन त्याला चारापाणी दिला जायचा. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की वखर मांडवात आणून थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. सायंकाळी परत ४ वाजेपासून त्याचे वखरणीचे काम सुरु व्हायचे तर पेरणी करण्यासाठी महिला मजुरांची शेताबांधाकडे एकच गर्दी दिसायची. नवनवीन कौटुंबिक गाणी कानावर पडायचे. दिवाळी झाली की पुन्हा गर्दीचा लोंढा शेता बांधावर दिसायचा. चरचर अशा उभ्या धान पिकाचा कापणीचा आवाज धान व विळा दरम्यान ऐकू यावयाचा. परंतु ते चित्र आज दिसेनासे झाले आहे. आज सामान्यातला सामान्य शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी कापणी करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे पैशाची तसेच वेळेचीही बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुरांची कमतरता हे सुद्धा कारण यांना कारणीभूत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे बळकट राहले नाही. वा वयमान घटत आहे. वखरणी झाल्यानंतर पेरणी, निंदन, खुरपणी, कीटकनाशकाची फवारणी व कापणी ही सर्व आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे. शेतारानात चिमण्या पाखरांचा घोंगावणारा आवाज यंत्रणाच्या आवाजात दबलेला आहे. माळरानातून शेतकऱ्याच्या पत्नीचे गाणे नाहीसे झाले. एवढे सर्व करूनही शेतकऱ्यांचा विकास पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही. खताचा वारेमाप तणनाशक जळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहिशी झाली. परिणामी निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. यातच शासनाचे दुर्लक्ष व शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्वीच्या परिस्थितीत होता. आजही त्याच अवस्थेत दिसून येत आहे. (वार्ताहर)