शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांचा वीज अभियंत्यांना महिनाभराचा अल्टिमेटम

By admin | Updated: August 21, 2015 00:19 IST

राज्यातील ११ कोटी ७० लाख लोकांचा वीज विभागाशी थेट संबंध आहे. ग्राहक सेवेचे व्रत स्वीकारले असताना तुम्ही लोकांच्या समस्यांचे समाधान करीत नाहीत.

विजेची अनियमितता भोवणार : मंत्री असावा तर असा जनतेचा सूरभंडारा : राज्यातील ११ कोटी ७० लाख लोकांचा वीज विभागाशी थेट संबंध आहे. ग्राहक सेवेचे व्रत स्वीकारले असताना तुम्ही लोकांच्या समस्यांचे समाधान करीत नाहीत. वीजेची समस्या उद्भवू नये यासाठी ऊर्जा विभागाने ठोस पावले उचलली असतानाही तुम्हाला जनतेच्या समस्या दिसत नाहीत. मी १६ तास काम करतो. तुम्ही कार्यालयात बसून गोष्टी हाकता. यापुढे असे चालणार नाही, अशी तंबी देत पुढील महिन्यातील भेटीत जिल्ह्यात अशी समस्या आढळून आली तर तुम्हाला घरी बसावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज अभियंत्यांना दिला.भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण, पारेषण समस्यांसंबंधी ना.बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारला आढावा बैठक घेतली. ही बैठक तब्बल रात्री १०.३० वाजतापर्यंत चालली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह जनतेने शेकडो समस्या मांडल्या. समस्या का सुटल्या नाहीत, त्यावर उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. उत्तरे देताना टाळाटाळीचा प्रकार लक्षात येताच ऊर्जामंत्री अधीक्षक व कार्यकारी अभियंत्यांवर जाम भडकले. आजच गोंदियात तिघांना निलंबित केले. याद राखा जनतेच्या समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर तुम्हाला घरी बसवावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.अपघातस्थळ दिसला तर याद राखाजिल्ह्यात कुठेही वाकलेले खांब दिसता कामा नये, तारांमध्ये झाडांच्या फांद्या गुंतलेल्या दिसू नये, ट्रान्सफार्मरवर वेली चढलेल्या असू नये, ट्रान्सफार्मरच्या खालील परिसर झुडूप व कचऱ्याने वेढलेला दिसू नये, खांब जमिनीपासून जीर्ण झालेला दिसू नये, याची पाहणी करण्यासाठी अधीक्षक अभियंतासह महिनाभरात गल्लीनगल्ली पिंजून काढा, असे आदेश अभियंत्यांना दिले. मी १६ तास काम करतो तुम्ही बसून राहता. महिनाभरानंतर पुन्हा येईन तेव्हा मी स्वत: गावात फिरेन. त्यावेळी अपघातस्थळ दिसले तर याद राखा, असा दमही ना.बावनकुळे यांनी दिला. यावेळी ते मुख्य अभियंता सतीश मेश्राम व कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्यावर चांगलेच भडकले. (जिल्हा प्रतिनिधी)-तर एफआयआर करेनवीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यापुढे अशा घटना घडल्या तर संबंधित अभियंत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली. अधीक्षक अभियंत्याचे कार्यकारी अभियंत्यांशी, कार्यकारी अभियंत्याचे उपविभागीय अभियंत्यांशी, उपविभागीय अभियंत्यांचे कनिष्ठ अभियंत्याशी आणि कनिष्ठ अभियंत्याचे शाखा अभियंते यांच्यात समन्वय नाही. सर्व टाळाटाळीची उत्तरे येत आहेत. वीज विभागात काम करायचे आहे की घरी बसायचे आहे, ते सांगा, असा इशाराही ना.बावनकुळे यांनी दिला.त्यांचा घरभाडे भत्ता बंद कराग्राहकसेवा मजबूत करणे हा वीज विभागाचा उद्देश आहे, असे असताना अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. जे अधिकारी मुख्यालयी न राहताही घरभाडे भत्ता उचलतात. त्यांचा भत्ता तातडीने बंद करण्यात यावा आणि त्यांना ब्रेक देण्यात यावा, असे निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांना दिले.वृत्तपत्रातील बातमी तक्रार समजातुम्ही एक तर लोकांच्या तक्रारी स्वीकारत नाहीत. तक्रार स्वीकारली तर लोकांना न्याय देत नाहीत. त्यामुळे जनता वृत्तपत्राच्या माध्यमातून तक्रार नोंदवितात. तुम्ही वृत्तपत्राच्या बातम्यांचीही दखल घेत नाहीत. दररोज तुमच्याबद्दल वाईट लिहून येते. यापुढे वृत्तपत्रातील बातमी ही तक्रार समजून समस्या निकाली काढा, असे निर्देशही ना.बावनकुळे यांनी दिले.