शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

चिचाळच्या बाजार चौकातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:48 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : जप्त मालमत्तेचा ग्रामसभेत लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले. रस्त्यावरील जनवारांचे गोठे हटविण्यात आले.स्थानिक बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाच्या पोळा उत्साहाला अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतने तात्काळ लक्ष केंद्रीत करुन अतिक्रमण धारकांना नोटीस बजावूनही ज्या अतिक्रमण धारकांनी अतिक्रण काढले नाही. त्यांचे टिन पत्रे, सिमेंट खांब जप्ती केले तर गाव शिवारातील माळराण जागेवरील व स्मशानभूमीतील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार आहे.गावात मेंढपाळ व्यवसाय करणारे धनगर बांधवांचे ७० ते ८० कुटूंबाचे वास्तव्य आहे. त्यांचा शेळ्यामेंढ्या पाळण्याचा वडीलोपार्जित व्यवसाय आहे. परिसरातील जंगल व माळरानावर शेळ्या मेंढ्यासह अनेक वर्षापासून गुजरान करीत आहेत.लोकांच्या अतिक्रमण करण्याच्या वृत्तीमुळे गावाच्या परिसरातील खुली जागा उपलब्ध नाही. शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हशी पाळीव जनावरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना पाळीव जनावरे विकावी लागत आहेत. मोजक्याच धनगर समाजाकडे पाळीव प्राणी शिल्लक आहेत. त्यांना चकारा, येथील चकार टेकडी रस्त्यावरील पाझर तलावाशेजारील जागेत व स्मशानभूमी शेजारील ढोरफोडी जागेवर अतिक्रमण करुन जमीन गडप केली. दफन भूमितही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने मृत जनावरे जागेअभावी दफनभूमितच फेकले जातात. धनगर बांधवांच्या पाळीव प्राण्यांसाठी चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर समस्या नुकत्याच झालेल्या १८ आॅगस्टच्या ग्रामसभेत स्मशानभूमी दफनभूमी व चकारा टेकडी परिसरातील अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतीचे अतिक्रमण काढण्याचा ठराव ग्रामवासीयांनी ग्रामसभेत घेतला. यावेळी ग्रामसभेत सरपंचा लोपमुद्रा वैरागडे यांनी अतिक्रमण केलेल्या जागेतील धानाचे पीक निघताच कुणाचीही गय न करता ते अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. समोर येणाऱ्या बैलाच्या पोळ्याला उत्साहाला अडचण निर्माण होत असतो. पंरतु काही अतिक्रमण धारक प्रत्येकच वर्षी नोटीस देवूनही अतिक्रमण काढत नाही. यावेळी ग्रामपचांयतने कुणाचीही हयगय न करता अतिक्रमण जागेतील साहित्य जप्त केले. कारवाईप्रसंगी सरपंचा लोपमुद्रा मनोज वैरागडे, उपसरपंचा मंजुषा जगतराम गभणे, निलेश काटेखाये, मोना तिभागेवार, वर्षा काटेखाये, दिनेश नंदपूरे, आशिष मेश्राम, शामलाल रामटेके, प्रदिप भुरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, रुपचंद उके आदी उपस्थित होते.बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाचा पोळा व बाजाराची डोकेदुखी वाढविली गत २० ते २५ वर्षापासून त्यांना नोटीस बजावूनही ग्रामपंचायत गेल्यावरच ते अतिक्रमण काढतात. त्यामुळे ज्यांनी नोटीस देवूनही अतिक्रमण काढले नाही. अशांची टिनपत्रे, सिमेंट खांब, लाकडे जप्ती केली आहे. त्यांचेवर दंड आकारुन त्यांना तंबी देण्याचे ग्रामपंचायतने निर्णय घेतला आहे.-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण