शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळच्या बाजार चौकातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:48 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : जप्त मालमत्तेचा ग्रामसभेत लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेले टिन पत्रे, सिमेंट खांब, विटा, लाकडे आदी साहित्य जप्त केले. रस्त्यावरील जनवारांचे गोठे हटविण्यात आले.स्थानिक बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाच्या पोळा उत्साहाला अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतने तात्काळ लक्ष केंद्रीत करुन अतिक्रमण धारकांना नोटीस बजावूनही ज्या अतिक्रमण धारकांनी अतिक्रण काढले नाही. त्यांचे टिन पत्रे, सिमेंट खांब जप्ती केले तर गाव शिवारातील माळराण जागेवरील व स्मशानभूमीतील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार आहे.गावात मेंढपाळ व्यवसाय करणारे धनगर बांधवांचे ७० ते ८० कुटूंबाचे वास्तव्य आहे. त्यांचा शेळ्यामेंढ्या पाळण्याचा वडीलोपार्जित व्यवसाय आहे. परिसरातील जंगल व माळरानावर शेळ्या मेंढ्यासह अनेक वर्षापासून गुजरान करीत आहेत.लोकांच्या अतिक्रमण करण्याच्या वृत्तीमुळे गावाच्या परिसरातील खुली जागा उपलब्ध नाही. शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हशी पाळीव जनावरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना पाळीव जनावरे विकावी लागत आहेत. मोजक्याच धनगर समाजाकडे पाळीव प्राणी शिल्लक आहेत. त्यांना चकारा, येथील चकार टेकडी रस्त्यावरील पाझर तलावाशेजारील जागेत व स्मशानभूमी शेजारील ढोरफोडी जागेवर अतिक्रमण करुन जमीन गडप केली. दफन भूमितही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने मृत जनावरे जागेअभावी दफनभूमितच फेकले जातात. धनगर बांधवांच्या पाळीव प्राण्यांसाठी चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर समस्या नुकत्याच झालेल्या १८ आॅगस्टच्या ग्रामसभेत स्मशानभूमी दफनभूमी व चकारा टेकडी परिसरातील अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतीचे अतिक्रमण काढण्याचा ठराव ग्रामवासीयांनी ग्रामसभेत घेतला. यावेळी ग्रामसभेत सरपंचा लोपमुद्रा वैरागडे यांनी अतिक्रमण केलेल्या जागेतील धानाचे पीक निघताच कुणाचीही गय न करता ते अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. समोर येणाऱ्या बैलाच्या पोळ्याला उत्साहाला अडचण निर्माण होत असतो. पंरतु काही अतिक्रमण धारक प्रत्येकच वर्षी नोटीस देवूनही अतिक्रमण काढत नाही. यावेळी ग्रामपचांयतने कुणाचीही हयगय न करता अतिक्रमण जागेतील साहित्य जप्त केले. कारवाईप्रसंगी सरपंचा लोपमुद्रा मनोज वैरागडे, उपसरपंचा मंजुषा जगतराम गभणे, निलेश काटेखाये, मोना तिभागेवार, वर्षा काटेखाये, दिनेश नंदपूरे, आशिष मेश्राम, शामलाल रामटेके, प्रदिप भुरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, रुपचंद उके आदी उपस्थित होते.बाजार चौकातील अतिक्रमणाने बैलाचा पोळा व बाजाराची डोकेदुखी वाढविली गत २० ते २५ वर्षापासून त्यांना नोटीस बजावूनही ग्रामपंचायत गेल्यावरच ते अतिक्रमण काढतात. त्यामुळे ज्यांनी नोटीस देवूनही अतिक्रमण काढले नाही. अशांची टिनपत्रे, सिमेंट खांब, लाकडे जप्ती केली आहे. त्यांचेवर दंड आकारुन त्यांना तंबी देण्याचे ग्रामपंचायतने निर्णय घेतला आहे.-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण