शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:25 IST

ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया

राहुल भुतांगे

तुमसर (भंडारा) : राज्यभरात विविध विभागांची सुमारे ७५ हजार पदे भरण्यात येणार असून, भंडारा जिल्हा परिषदेमध्येही कर्मचाऱ्यांची ३२० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र भरतीसाठी परीक्षा शुल्क एक हजार ते ९०० रुपये आकारण्यात आल्याने ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेत ३२० पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पदे असून परीक्षेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सॉफ्टवेअरची कॉपी जिल्हा परिषदांना पाठवण्यात आली आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली असून, या भरती प्रकियेतून खासगी एजन्सी मात्र मालामाल होणार आहे.

या परीक्षा शुल्काचा विषय विधानसभेतही गाजला होता. त्यानंतरही भरमसाठ शुल्क आकारणी कायमच असल्याने बेरोजगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गरीब बेरोजगार युवकांना वंचित ठेवण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप होत आहे. एमपीएससीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी ३०० ते ३५० रुपये शुल्क असताना ही ऑनलाइन परीक्षा असूनही येथेच जास्त शुल्क का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनाथांवरही अन्याय

या पदभरतीत अनाथांसाठी मोजक्या जागा राखीव असल्या तरी परीक्षा शुल्कात त्यांना कोणतीही विशेष सवलत प्रदान केलेली नाही. त्यांच्यावरही या अनिवार्य शुल्काचा भार पडणार आहे. आधीच अनाथ असलेल्यांनी एवढी परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे आणावे कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बेरोजगार म्हणतात...

आम्ही बेरोजगारीने त्रस्त आहोत. राज्य शासनाने शुल्कातून विद्यार्थ्यांची मांडलेली लूट तत्काळ थांबवावी

- कार्तिकी देशमुख, लोभी

वाढीव परीक्षा शुल्क अन्यायकारक आहे. एका पेक्षा अधिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आर्थिक कुचंबणा होणार आहे.

- पल्लवी बोरकर, आष्टी 

अ आणि ब तसेच क आणि ड गटातील शुल्कात तफावत ठेवणे ही सर्व सामान्य बेरोजगारांना डावलण्याची शासनाची खेळी आहे.

- गुलशन मेश्राम, तुमसर

पद भरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी नसून परीक्षा शुल्काच्या माध्यमातून लुट करून कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी आहे.

- अश्विन देशमुख, तुमसर

टॅग्स :Socialसामाजिकjobनोकरी