शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मानधनापासून कर्मचारी वंचित

By admin | Updated: July 30, 2016 00:34 IST

तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने सन २०१०-१२ मध्ये ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका घेतल्या होत्या.

शासनाची सदोष कारवाई : कर्मचारी त्रस्तभंडारा : तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने सन २०१०-१२ मध्ये ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका घेतल्या होत्या. मात्र तत्कालीन सरकारच्या सदोष कार्यवाहीमुळे ग्रामपंचायत निवडणूकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजुनपर्यंत मानधन देण्यात आले नाही. याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, अशा इशारा भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कान्हेकर यांनी दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सन २०१० व २०१२ मध्ये काही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणूकांचे काम पार पाडण्यासाठी विविध कार्यालयात तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची निवडणूक काळापूरती नियुक्ती करण्यात आली होती.निवडणूक कामासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम जबाबदारीपुर्वक तसेच विश्वासार्हपणे पार पाडले. निवडणूकीचे कार्य ज्या दिवशी पार पडले जाते त्याच दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या पदनामाप्रमाणे मानधन अदा करण्याची तरतूद आहे. परंतु तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने ग्रामपंचायतीचा मानधन अदा करण्यास निधी उपलब्ध करुन दिला नाही. कोणत्याही कामाचा मोबदला संबंधीतास विहित कालावधीत उपलब्ध करुन देणे हे त्या कर्मचाऱ्यांचे संविधानात्मक अधिकार व हक्क असतांना तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सरकारने कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन देण्यासाठी टाळाटाळ करुन आर्थिक शोषण केल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सन २०१० व सन २०१२ या वर्षातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा मानधन अदा करण्यास निधी उपलब्ध करुन द्यावा अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. याप्ररकणी शासन-प्रशासनाने वेळीच दखल घेवून सम्यक विचार करुन व समन्वय साधुन ग्रामपंचायत निवडणूकीचा मानधन तात्काळ अदा करावा अशी मागणी भंडारा जिल्ळा विकास संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अशोक कान्हेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)