शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

राजकीय व सामाजिक संघटनांचा ईव्हीएमविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:45 IST

निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले. यापुढे जनता ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राजकीय पक्षांकडून दिला जात आहे.निवेदनानुसार, लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशा धक्कादायक निकालामुळे मतदारही अचंब्यात आहेत. यामुळे पराभूत झालेल्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून देशभरात यावर चर्चा होत आहे. मात्र याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारून येणाºया निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवडणूक होत असताना पारदर्शकता असली पाहिजे. प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला असतानाही त्याचा वापर करीत नसून तेथे बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करता येते. सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना ईव्हीएम विरोधात आहेत. निवडणूक आयोगाचा याबाबतीत एकतर्फी कारभार सुरू आहे. ईव्हीएम विरोधात सर्वसामान्य नागरीक देखील असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून आता त्याविरोधात लोकलढा उभारावा लागेल असा सूर राजकीय पक्षांच्या नेत्यांचा निघत आहे. येणारी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हवी ही नागरिकांची भावना आहे. जपान, नेदरलँड आणि अमेरिका या देशांमध्ये ईव्हीएमची चीप तयार होते. तर ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली किंवा पध्दत अंगिकारली त्या देशांनीही आता ईव्हीएमची पध्दत बाजूला ठेवली आहे. भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेच्या मतांवर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे ईव्हीएम बंद होणे काळाची गरज आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमचा विरोध करीत असताना निवडणूक आयोगाने दखल घेणे क्रम प्राप्त ठरते. मात्र त्यांच्या कारभारावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देत आंदोलने काढली जात आहेत.

 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूक