शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्याने वीज कंपनीने या तिन्ही गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा ग्रामपंचायत प्रशासनाने भरणा केला नसल्याने तालुक्यातील एकूण ३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कारवाई तालुक्यातील वीज वितरण कंपनीने केली असल्याने तालुक्यातील ३ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप केला जात आहे.तालुक्यातील मांढळ, तई (बुद्रुक) व डांभेविरली या तीन गावांत शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध केले जात आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्याने वीज कंपनीने या तिन्ही गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील मांढळ, तई बुद्रुक व डांभेविरली या तीन गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, स्थानिक लाखांदूर तालुक्यातील एकूण ८९ गावांतर्गत ६१ पाणीपुरवठा योजना असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील बारव्हा वीज मंडळात १२, लाखांदूर वीज मंडळात १५, सरांडी बुद्रुक वीज मंडळात १० व विरली बुद्रुक वीज मंडळात २४, असे एकूण ६१ पाणीपुरवठा योजना असल्याची माहिती आहे. ६१ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपासून एकूण २८ लाख ७२ हजार रुपयाचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यास वीज कंपनींतर्गत वीजपुरवठा खंडित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

६१ ग्रामपंचायतींतर्गत १०३ पथदिव्यांचे कनेक्शन- तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन असल्याची माहिती आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी मागील काही वर्षांपासून या पथदिव्यांच्या थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न केल्यास तालुक्यातील थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांच्या वीजपुरवठा देखील खंडित केला जाण्याचे संकेत दिले जात आहे.

 

टॅग्स :electricityवीजgram panchayatग्राम पंचायत