शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

पायाभूत चाचणीत शिक्षण विभाग ‘नापास’

By admin | Updated: October 1, 2015 00:45 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

वेळापत्रक तयार : शिक्षकांचे अध्यापनाचे तास खर्चअशोक पारधी पवनीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णयात चाचणी आयोजनाचे वेळापत्रक देण्यात आले. परंतु शाळास्तरावर घ्यावयाची पायाभूत चाचणीसाठी वेळेवर प्रश्न संच उपलब्ध झाले नाही. परिणामी दोन महिने उशिरा पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे. त्यापेक्षाही वाईट म्हणजे पुरेशा प्रमाणात प्रश्नसंच उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील शाळांना प्रश्न संचाची झेरॉक्स करून पायाभूत चाचणी घ्यावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पायाभूत चाचणीत शिक्षण विभाग सर्व पातळीवर नापास झाले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २०११ अन्वये व यानुरुप इयत्तेत प्रवेश, विद्यार्थ्यास एका वर्षापेक्षा अधिक काळ एका इयत्तेत न ठेवणे, इयत्ता आठवी पर्यंत कोणत्याही मंडळाची सार्वत्रिक परीक्षा पुढील वर्गात जाण्यासाठी धाकी न लागणे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंब यासारख्या बदलामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होईल, असा जनमानसात निर्माण झालेला समज दूर करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. हा कार्यक्रम स्तुत्य असला तरी त्यात बऱ्याच उणिवा राहिलेल्या आहेत. तोंडी व लेखी चाचणी घेण्यासाठी शिक्षकांना त्यांचे शिकविण्याचे तास खर्च करावे लागणार आहेत. अप्रगत राहिलेल्या विद्यार्थ्यांना बरोबरीने आणण्यासाठी प्रगत असलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित शालेय चाचण्यापेक्षा पायाभूत प्रश्नसंच वेगळे असल्याने प्रश्नसंच समजावून देण्यात शिक्षकांचे अध्यापनाचे तास खर्च होत आहेत.नियोजनाच्या अभावामुळे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मराठी माध्यमाचे प्रश्नसंच पुरवठा करण्यात आल्याची ओरड आहे. तसेच कित्येक शाळांना प्रश्नसंच अपुऱ्या संख्येत उपलब्ध झाल्याने प्रश्नसंचाची झेरॉक्स करून चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे शाळांना आर्थिक भुर्दंड पडलेला आहे. यासर्व प्रकारामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.