शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:59 IST

जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात.

ठळक मुद्देमिकी ईनोकी : बेला येथे पर्यावरण समस्या विषयावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात. भारतात पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जपानच्या नागो विद्यापीठाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ.मिकी ईनोकी यांनी केले.भंडारा तालुक्यातील बेला येथील महेंद्र महाविद्यालयात ‘भारत आणि दक्षिण आशियात पर्यावरणाची समस्या’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिग्मे सुल्ट्रीन, नागपुरचे संदेश मेश्राम उपस्थित होते. डॉ.इनोकी म्हणाल्या, पर्यावरणाच्या संतुलनाकरिता जपान इतर देशांना आर्थिक मदत करते. भारतानेही पर्यावरणासाठी पुढाकार घेऊन नागरिकांना शिक्षित करावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना सुल्ट्रीन म्हणाले, जगातील सर्वात उंच तिबेटच्या पठारातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, लाओस, कंबोडियाच्या दिशेने सिंधू, सतलज, ब्रम्हपुत्रा, येस्लो, यांगसी, साल्वी, मेकाँग इत्यादी नद्या वाहतात. परंतु तिबेटमधील संरक्षीत जंगलात अंधाधुंद कटाई चालू असून त्यामुळे पर्यावरणाचा तोल जात आहे. त्याचा परिणाम दक्षिण आशियातील नागरिकांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.संचालन प्रा.मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक प्राचार्य अर्जुन गोडबोले तर आभार प्रा.शुभांगी बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.गडकरी, प्रा.मेश्राम, प्रा.ढोक, प्रा.खोब्रागडे, प्रा.शहारे, निंबार्ते, मते, गजभिये, कांबळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :environmentवातावरण