शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या खा आणि निरोगी राहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

भंडारा : मानवी आहारात प्रामुख्याने अनेक भाज्यांचा समावेश होतो. धान्य, कडधान्यानंतर मानवी आहारात विविध भाज्यांचा समावेश होतो. आपल्या ...

भंडारा : मानवी आहारात प्रामुख्याने अनेक भाज्यांचा समावेश होतो. धान्य, कडधान्यानंतर मानवी आहारात विविध भाज्यांचा समावेश होतो. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंदमुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ हजार प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांना मागणी वाढत चालल्याने रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होत आहे. संपूर्ण जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १,५३०पेक्षा अधिक वनस्पती, भाज्यांचा दैनंदिन आहारात वापर करतात. जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या या मानवी शरीरासाठी फार आवश्यक आहेत. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना यामुळे रोजगारही मिळतो.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का ....

१) पाथरी -

पाथरीची भाजी जिल्ह्यात आजही मिळते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली, वरोरा, सिंदेवाही परिसरात या भाजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाथरीची भाजी बनवताना चिरलेली भाजी उकडून, शिजवून घ्यावी. डाळ, दाणे घालून फोडणी देताना दोन हिरव्या मिरच्या टाकून त्या एकत्र ढवळून एकजीव करावी. भाजीत थोडासा आंबटपणा येण्यासाठी ताक किंवा थोडासा गूळ घालून भाजी करता येते.

२) कुरडूची भाजी ...

कुरडूची पाने ही तुळशीच्या पानाएवढी असतात. ही भाजी शक्यतो ऑगस्ट, सप्टेंबरच्या कालावधीत चांगली वाढते. कुरडूची भाजी आजही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येते. कुरडूची पाने, बियाही उपयुक्त असतात.

३) आघाडा-

आघाड्याची कोवळी पाने बेलाच्या झाडाप्रमाणे शेंड्याकडे निमुळती असतात. आघाड्याची कोवळी पाने, बिया उपयुक्त आहेत. आघाड्याची पाने तोडून त्यामध्ये लसूण, कांदा, डाळीचे पीठ, फोडणीचे साहित्य घेऊन भाजी चिरून धुवून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या तेलात टाकून भाजी करावी.

४) घोळ भाजी-

घोळ भाजी ही साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत आढळते. जिल्ह्यात दिवाळीनंतर

रब्बी हंगामात ही भाजी विक्रीसाठी येते. अनेकदा भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहजरित्या उगवते.

५) भुई आवळा-

भुई आवळ्याची पाने अतिशय नाजूक म्हणजेच शेवग्याच्या पानांपेक्षा लहान असतात. भुई आवळ्याची स्वच्छ केलेली दोन वाट्या भाजी, अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मूग डाळ, दाण्याचे कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण टाकून कुकरमध्ये लसूण टाकून शिजवून नंतर फोडणी द्यावी.

या भाज्या झाल्या दुर्मीळ

१) केना-

केनाची भाजी आज दुर्मीळ होत आहे. शक्यतो पावसाळ्याच्या कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना. ही भाजी आज दुर्मीळ होत आहे. भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जीरा, केना भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जिरे, लाल तिखट, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून आवश्‍यकतेनुसार पाणी टाकून ही भाजी बनवता येते. केनाचे थालीपीठही बनवले जाते. कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना आहे.

२) कपाळफोडीची भाजी

चंद्रपूर जिल्ह्यात कपाळफोडीच्या भाजीला स्थानिक नाव फोफांडा आहे. वेलवर्गीय ही भाजी असून, त्याच्या पानांची भाजी करतात. सेपिडीएसी या कुळातील ही भाजी आहे. कपालफोडीची पाने तोडून तेल, कांदा, मिरची, जिरेे, तिखट, मीठ, हळद, मीठ, कोथिंबीर, टोमॅटो, टाकून ही भाजी बनवतात.

३) खापरफुटीची भाजी

स्थानिक नाव खापरफुटी या नावानेच ही भाजी ओळखली जाते. याची पाने तोडून तेल, कांदा, लसूण, मिरची, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून बनवतात. सर्वप्रथम भाजी धुवून तेल गरम करून कांदा फोडणी देऊन सर्व साहित्य टाकून शिजवून नंतर कोथिंबीर टाकावी.

कोट

डोंगर, जंगल, शेतशिवारात उगवलेल्या या रानभाज्यांवर कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी केलेली नसते. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे आहारात विशेष महत्व आहे. शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना माहिती व्हावेत. या हेतूने कृषी विभागातर्फे ९ ऑगस्ट २०१९पासून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

मिलिंद लाड,

उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा