शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक चौकशीत नवीन प्रकरण बाहेर

By admin | Updated: October 14, 2015 00:36 IST

बनावट आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सन २०१५ चे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर नागपूर सहसंचालक कार्यालयाने चौकशी सुरू केली.

प्रकरण लाखांदूर आयटीआयचे : बयाणात अनेकांचे बिंग फुटलेलाखांदूर : बनावट आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सन २०१५ चे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर नागपूर सहसंचालक कार्यालयाने चौकशी सुरू केली. त्यानंतर दररोज एक ना अनेक प्रकरण बाहेर निघत आहे. याप्रकरणात अनेक मासे गळाला लागण्याचे संकेत चौकशी समितीने वर्तविले आहे.लाखांदूर आयटीआयमधील ३२ विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेशाचे प्रकरण तपासात असताना मानव विकास कार्यक्रमातंर्गत सन २००७ पासून प्राध्यापक व कर्मचारी बदलून गेल्यानंतरही किंमती साहित्य गहाळ होणे, प्रभार न दिल्याने कोट्यवधींच्या साहित्यांची चोरी झाल्याचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. दि. ९ आॅक्टोबरला नागपूर येथील चौकशी समितीने लाखांदूर आयटीआयला भेट देऊन सन २०१३ पासूनचे आॅनलाईन भरती प्रक्रियेतील संपूर्ण दस्तऐवज, संगणक, हार्डडिस्क, सॉफ्ट व हार्ड कॉपी ताब्यात घेतल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरवर्षी या आयटीआयमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत अल्प कालावधीकरिता साहित्य व प्रशिक्षण कालावधीकरिता मानधन दिले जात होते. यात मर्जीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दर्शवून मानव विकास कार्यक्रमाचा वाट लावण्यात आली. सन २००७ पासून सदर संस्थेतील कार्यरत कर्मचारी, प्राध्यापक यांचे स्थानांतरण झाल्यानंतर त्यांचा प्रभार अद्याप न दिल्याने संस्थेतील महागडे साहित्य गहाळ झाल्याचे तपासात दिसून आले. वारंवार प्रभारी प्राचार्य या महाविद्यालयाला मिळत असल्याने प्राध्यापकांचे प्रशिक्षण संस्थेत कधीही येणे जाणे यामुळे वर्ग वेळेवर भरत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल करून उत्तीर्ण करण्याची हमी या महाविद्यालयातील प्राध्यापक देत असत. सन २०१३ ते २०१५ पर्यंत आॅनलाईन प्रवेश भरती प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांकडून आर्थिक रक्कम वसूल करून तेथील प्राध्यापकांनी कमाई केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. या संबंधाने नागपूर सहसंचालक कार्यालयाने काही प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविले आहेत. यात ज्या प्राध्यापकांनी पैशाची मागणी करून बनावट प्रवेश दिला त्या विद्यार्थ्यांनी आपल्या बयाणात पैसे दिल्याचे कबूल केले आहे. नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाने आता लाखांदूर आयटीआय प्रकरणात सखोल चौकशी सुरु केली. सन २००७ पासूनच्या संपूर्ण प्रकरणाची व आयटीआयमधील आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु असून यात डझनभर कर्मचारी, प्राध्यापकांवर कारवाईचे संकेत असून निलंबनाची कारवाई होणार म्हणून सहसंचालकांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)