शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ई-केवायसी आवश्यक, अन्यथा नोव्हेंबरपासून होणार रेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:16 IST

Bhandara : स्वस्त धान्यासाठी पडताळणीची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे. जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई- केवायसीतून घेतला जाईल. तसेच बोगस लाभार्थीना चपराक बसेल. थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य वाटप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

थम्ब व्हेरिफिकेशनला अवघे काही दिवस उरले असल्याने रेशन कार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे विनामूल्य मिळणारे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

प्रत्येक लाभार्थीला आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रणेमध्ये आपला आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदांची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

स्थलांतरित कुटुंबालादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी लागेल. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ही प्रक्रिया सुरू असून, शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.

वेळेपूर्वीच आपली ई-केवायसी करून घ्या शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांनी वेळेपूर्वीच आपली ई- केवायसी करून घ्यावी. तसेच भविष्यात आपले ई-केवायसीअभावी कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना