शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ई-केवायसी आवश्यक, अन्यथा नोव्हेंबरपासून होणार रेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:16 IST

Bhandara : स्वस्त धान्यासाठी पडताळणीची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे. जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई- केवायसीतून घेतला जाईल. तसेच बोगस लाभार्थीना चपराक बसेल. थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य वाटप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

थम्ब व्हेरिफिकेशनला अवघे काही दिवस उरले असल्याने रेशन कार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे विनामूल्य मिळणारे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

प्रत्येक लाभार्थीला आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रणेमध्ये आपला आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदांची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

स्थलांतरित कुटुंबालादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी लागेल. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ही प्रक्रिया सुरू असून, शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.

वेळेपूर्वीच आपली ई-केवायसी करून घ्या शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांनी वेळेपूर्वीच आपली ई- केवायसी करून घ्यावी. तसेच भविष्यात आपले ई-केवायसीअभावी कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना