शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

ई-केवायसी आवश्यक, अन्यथा नोव्हेंबरपासून होणार रेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:16 IST

Bhandara : स्वस्त धान्यासाठी पडताळणीची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे. जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई- केवायसीतून घेतला जाईल. तसेच बोगस लाभार्थीना चपराक बसेल. थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य वाटप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

थम्ब व्हेरिफिकेशनला अवघे काही दिवस उरले असल्याने रेशन कार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे विनामूल्य मिळणारे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

प्रत्येक लाभार्थीला आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रणेमध्ये आपला आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदांची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

स्थलांतरित कुटुंबालादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी लागेल. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ही प्रक्रिया सुरू असून, शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.

वेळेपूर्वीच आपली ई-केवायसी करून घ्या शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांनी वेळेपूर्वीच आपली ई- केवायसी करून घ्यावी. तसेच भविष्यात आपले ई-केवायसीअभावी कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना