शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 24, 2015 00:37 IST

३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे.

देखभाल दुरूस्ती अडली : टाकीचा उपसा नाही, नदी पात्रात पाण्याचा ठणठणाट, नियोजन अभावी शेतकरी संकटातरंजित चिंचखेडे चुल्हाड /सिहोरा३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे. यामुळे १४ हजार हेक्टर आर शेती सिंचनापासून वंचित ठेवण्याचे संकट उभे झाले आहे.या शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी बावनथडी नदी पात्रात सोडण्याचे नियोजन शासन आणि प्रशासनाकडे नाही, अशी माहिती मिळाली आहे. बावनथडी नदीवर सिहोरा परिसरात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे उपसा करण्यात आलेले पाणी विस्तीर्ण चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. पावसाळापुर्वी जलाशयात २० टक्के पाणी राखून ठेवण्यात येत असताना यंदा जलाशयाची जीर्ण दरवाजा दुरूस्ती करताना पाटबंधारे विभागाने मार्च महिन्यात जलाशयातील पाणी निरंक केलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाऊस नसतानाही धानाची नर्सरी वाचविण्यासाठी पाणी मिळाले नाही. पाणी नसल्याने धानाची नर्सरी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओठवले आहे. दरम्यान नियोजन अभावी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प संकटात अडकला आहे. या प्रकल्पाचे नियंत्रण तिरोडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयातून होत आहे. प्रकल्पाच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. परंतु मध्यंतरी आलेल्या पावसाचे पाणी टाकीत शिरल्याने यंदा टाकीतील गाळ काढता येणार नाही. याशिवाय प्रकल्पात ९ पंपगृह आहेत. संपूर्ण पंपगृहाचा नदी पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी उपयोग करण्यात आलेला नाही. केवळ ४ पंपगृह सुरू केली जात आहे. परंतु या पंपगृहाची देखभाल आणि दुरूस्ती अडली आहे. निधीअभावी या प्रकल्पस्थळात ठिक ठाक नाही, अशी माहिती मिळाली आहे.हा प्रकल्प मागील आठ वर्षापासून अनेक उतार चढाव अनुभवत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियंत्रणात हा प्रकल्प आहे. पाणी वाटप करताना पाणीपट्टी करांची रक्कम शेतकरी लघु पाटबंधारे विभागाकडे जमा करीत आहेत. प्रकल्पाची देखभाल आणि दुरूस्ती तिरोडा उपसा सिंचन योजना यांचे नियंत्रणात होत आहे. या प्रकल्पात हस्तांतरणाचा वाद आहे.प्रकल्पस्थळात २ आॅपरेटर व ३ सुरक्षा गार्ड आहे. ११० कोटींचा प्रकल्प अल्प सुरक्षा रक्षकांच्या नियंत्रणात आहे. प्रत्यक्षात ९ सुरक्षा गार्डाची गरज आहे. परंतु यात कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान ३ सुरक्षा गार्डाचे गेल्या ४ महिन्यापासून वेतन प्राप्त झाले नाही. यंदा प्रकल्पात नियमित पाण्याचा उपसा होणार किंवा नाही हे आता सध्यातरी संशयास्पद आहे. गेल्यावर्षी १ आॅगस्टला पंपगृह सुरू करण्यात आले होते. तर ५६ दिवसनंतर २५ सप्टेंबर रोजी हा बंद करण्यात आले होते. यामुळे ३६ फुट पाण्याची साठवणूक जलाशयात झाली होती तर १० हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आली होती. परंतु यंदा तसे चित्र या प्रकल्पस्थळात नाही. ही प्रकल्पनदी पात्रातून पाण्यावा उपसा करण्यास सज्ज असून पावसाची प्रतिक्षा असल्याची माहिती प्रकल्प स्थळातील आपरेटर यांनी दिली.