शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे दुर्लक्षामुळे आरोग्यावर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:53 IST

कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे.

ठळक मुद्देभाष्कर टिचकुले : पटेल महाविद्यालयात समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन भाष्कर टीचकुले (दुबई) यांनी केले.स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे आयोजत विकसनशील यांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील स्वास्थ्य व सुरक्षितता विषयक जाणीव या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगीमंचावर डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. दिपक राऊत, डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.टीचकुले म्हणाले की , आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनुसार जगात कामाच्या ठिकाणी ३ लाख ३५ हजार अपघात होतात त्यापैकी १ लाख ७० हजार कृषीक्षेत्रात मृत्युचे प्रमाण आहे.यासंदर्भात त्यांनी विस्तृत आकडेवारी प्रस्तुत करून शेतकºयांची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी व त्यामध्ये जाणीव- जागृती निर्माण होण्यासाठी शासनाद्वारे आणि शेतकºयांच्या सामाजिक संघटनांद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान त्यांनी केले. भारतातील शेती प्रश्नांची चर्चा करताना ते म्हणाले की विकसनशील देशात शेतीतील अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात २६३ मिलीयन लोक शेतीवर अवलंबून आहेत, यापैकी स्त्रियांच्या वाटा ३७ टक्के आहे.शेती प्रक्रियेतउपयोगात आणल्या जाणाºया ट्रॅक्टर, थ्रेशर मशिन, खते व किटकनाशकांमुळे शेतकºयांना बहिरेपणा, दमा, विषबाधा, कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेकदा मृत्यू घडून येतात.या क्षेत्रातील अपघातांची शासकीय स्तरांवर कोठेही नोंद होत नाही. कृषी-यंत्र आणि उत्पादक आणि कीटकनाशक विक्रेते शेतकºयांनाही योग्य माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आता शासकीय स्तरावर सुरक्षितता प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.प्रास्ताविक गणेश खडसे यांनी तर संचालन विक्की राऊत व तितीक्षा रंगारी यांनी केले. विवेक मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गायत्री हिरापुरे, समीर कावरे, सुशुप्ती काळबांडे, कौतुक मेश्राम, अमिता राऊत, निखद शेख, आयुषी गजापुरे, गौरी ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.