शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

शेतीकडे दुर्लक्षामुळे आरोग्यावर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:53 IST

कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे.

ठळक मुद्देभाष्कर टिचकुले : पटेल महाविद्यालयात समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन भाष्कर टीचकुले (दुबई) यांनी केले.स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे आयोजत विकसनशील यांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील स्वास्थ्य व सुरक्षितता विषयक जाणीव या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगीमंचावर डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. दिपक राऊत, डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.टीचकुले म्हणाले की , आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनुसार जगात कामाच्या ठिकाणी ३ लाख ३५ हजार अपघात होतात त्यापैकी १ लाख ७० हजार कृषीक्षेत्रात मृत्युचे प्रमाण आहे.यासंदर्भात त्यांनी विस्तृत आकडेवारी प्रस्तुत करून शेतकºयांची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी व त्यामध्ये जाणीव- जागृती निर्माण होण्यासाठी शासनाद्वारे आणि शेतकºयांच्या सामाजिक संघटनांद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान त्यांनी केले. भारतातील शेती प्रश्नांची चर्चा करताना ते म्हणाले की विकसनशील देशात शेतीतील अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात २६३ मिलीयन लोक शेतीवर अवलंबून आहेत, यापैकी स्त्रियांच्या वाटा ३७ टक्के आहे.शेती प्रक्रियेतउपयोगात आणल्या जाणाºया ट्रॅक्टर, थ्रेशर मशिन, खते व किटकनाशकांमुळे शेतकºयांना बहिरेपणा, दमा, विषबाधा, कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेकदा मृत्यू घडून येतात.या क्षेत्रातील अपघातांची शासकीय स्तरांवर कोठेही नोंद होत नाही. कृषी-यंत्र आणि उत्पादक आणि कीटकनाशक विक्रेते शेतकºयांनाही योग्य माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आता शासकीय स्तरावर सुरक्षितता प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.प्रास्ताविक गणेश खडसे यांनी तर संचालन विक्की राऊत व तितीक्षा रंगारी यांनी केले. विवेक मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गायत्री हिरापुरे, समीर कावरे, सुशुप्ती काळबांडे, कौतुक मेश्राम, अमिता राऊत, निखद शेख, आयुषी गजापुरे, गौरी ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.