शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

कमी वीज दाबाने धान पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:41 IST

कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता विजेच्या कमी दाबाचा फटका सहन करावा लागत आहे.

नवे संकट : परिसरातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेंडा (कोयलारी) : कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता विजेच्या कमी दाबाचा फटका सहन करावा लागत आहे. वीज विभागाच्या भोंगळ कारभाराने या परिसरातील शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवानी, कोयलारी, मोहघाटा, सालईटोला, कन्हारपायली, उशिखेडा, प्रधानटोला, कोहळीटोला, नरेटीटोला व पुतळी येथील शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिक करपले आहे. याची तक्रार देवरी येथील उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार करण्यात आली. मात्र यावर तोडगा न काढता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांवर नव्या संकटाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे.सततच्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी यावर्षी या परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या धान गर्भात येत आहे. अशावेळी धानाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु विजेचा दाब खूपच कमी असल्याने मोटारी सुरूच होत नाहीत. त्यामुळे धान पीक करपत आहे. याची माहिती वीज विभागाच्या अभियंत्यांना वारंवार देण्यात आली. यावर तोडगा न काढता कोणते ना कोणते कारण पुढे करुन ते टोलवा टोलवी करीत आहेत. मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात आली. धान पिकासाठी एप्रिल महिन्यातच पाण्याची अधिक गरज भासते. विजेचा दाबच अत्यल्प असल्याने मोटारी सुरूच होत नाहीत. पाण्याअभावी धान पीक वाळत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कुटुंबानिशी शेतात राबून शेतकरी रक्ताचे पाणी करतो. धानाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका, सोसायटी तसेच आपसात उसनवारीची रक्कम घेऊन शेतात ओतून टाकली. अशातच पाण्याअभावी धानपिक नष्ट होत असल्याच्या मार्गावर आहे. कर्जाची परतफेड कशी होईल या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल आता विचारला जाता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडाव्या हे कळायला मार्ग नाही. शेवटचा उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गटनेता गंगाधर परशुरामकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीवर तासभर चर्चा केली व लेखी निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच आनंदराव ईळपाते, मुकुंदराव कापगते, बाबुलाल सयाम, किशोर लांजेवार व नरेश टेंभरे हे होते. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. पांढरी परिसरातही पीक करपले पांढरी : परिसरातील सितेपार, मालीजुंगा, धानोरी, कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, चिचटला, रेंगेपार, मुंडीपार आदि गावांत काही प्रमाणात चुलबंद जलाशयातून पाणी पुरवठा होत असतो. तर काही शेतकऱ्यांनी वीज विभागाकडून कनेक्शन घेतले आहे. सौंदड येथील मुख्य विद्युत कार्यालयातून वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी करपू लागले आहे. प्राथमिक अवस्थेतच पिकांची वाढ पाण्याअभावी खुंटलेली वाटत आहे. अभियंता बडोले यांच्याशी बोलले असता त्यांनी दोन दिवसांत निराकरण करु असे सांगितले. परंतु आठ दिवसांचा कालावधी उलटूनही कसलीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कोसमतोंडी परिसरातील शेतकरीबांधवांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांसह विद्युत अधिकाऱ्यांना बोलावून लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. काही शेतकऱ्यांनी वीज पुरवठा शेतीकरिता होत नसताना वीज कनेक्शन का दिले असा सवाल केला. (वार्ताहर)शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा वीज क नेक्शन घेऊनही पंपासाठी वीज पुरवठा होत नसेल व पाण्यासाठी अभावी पीक मरत असेल तर वीज कनेक्शनचा फायदा काय असा सवाल आता परिसरातील कृषी पंपधारक शेतकरी करीत आहेत. वीजेचे बील भरून सुद्धा पीक व मरत असल्यास याला जबाबदार कोण असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे वीज विभागाने वीज पुरवठ्यात सुधारणा न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा अविनाश काशीवार, वामेश्वर टेंभरे, निरज मेश्राम व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.