शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धारगाव येथे हिवतापाने विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:11 IST

आरोग्य विभाग जनजागृतीवर कितीही वारेमाप निधी खर्च करीत असलातरी निष्पाप गरीबांचा जीव आजारांमुळे जात असल्याच्या घटना नेहमी घडत असतात.

ठळक मुद्देनववर्षदिनी पसरली शोककळा: अपत्यांवर नागपुरात उपचार सुरूच

आॅनलाईन लोकमतभंडारा : आरोग्य विभाग जनजागृतीवर कितीही वारेमाप निधी खर्च करीत असलातरी निष्पाप गरीबांचा जीव आजारांमुळे जात असल्याच्या घटना नेहमी घडत असतात. अशीच घटना धारगाव येथे सोमवारी घडली. यात हिवतापाने ३४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला तर, तिचे दोन्ही अपत्य नागपूरात उपचारार्थ दाखल आहेत. प्रियंका विनेश करवाडे रा. धारगाव, असे मृत विवाहितेचे नाव आहे.माहितीनुसार, प्रियंका यांची प्रकृती काही दिवसांपासून चांगली नव्हती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयांतही तपासणी व उपचार सुरु केला. मात्र तिला आराम झाला नाही. तिच्यावर मागील तीन दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवारी प्रियंका यांची प्रकृती ढासळली. त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आले.वैद्यकिय चाचणीत त्यांना हिवताप झाल्याचे निष्पन्न झाले. हा रोग किटकजन्य आजार असल्यामुळे त्यांची लागण तिच्या दोन्ही मुलींनाही झाली. दरम्यान उपचारादरम्यान सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास प्रियंका यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या दोन्ही मुलींवर नागपूर येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यामागे पती, सासु, सासरे, तीन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला सकाळी १० वाजता धारगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.जिल्ह्यात हिवताप विभागातर्फे दरवर्षी रक्त तपासणी मोहिम राबविली जाते. यावर जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे लक्षावधी रूपयांची उधळपट्टीही केली जाते. शहरात या कारवाईचा उदोउदो केला जात असला तरी ग्रामीण भागात स्वच्छतेच्या अभावामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो.ममत्व हिरावलेसुखी संसाराची स्वप्न रंगवित असतानाच प्रियंका यांची प्राणज्योत आजारामुळे मालविली. त्यांना तीन मुली अपत्य रुपाने लाभल्यात. शेवटच्या क्षणी मृत्यूशी झुंज देत असताना जीवन हरले व मृत्यूचा विजय झाला. तिन्ही मुलींवरची आईची माया नियतीने क्षणात हिरावली. घटनेची माहिती धारगाव येथे कळताच परिसरात शोककळा पसरली.