शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडली सिंचन योजना

By admin | Updated: May 26, 2015 00:39 IST

इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून दिघोरी परिसरातील ..

व्यथा झरी उपसा सिंचन योजनेची : आश्वासनाची पूर्तता होणार केव्हा?लाखांदूर : इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडण्यात यावे या मागणीसाठी मागील १० वर्षापासून दिघोरी परिसरातील शेतकऱ्यांचा शासनाविरूद्ध लढा सुरू आहे. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी व बारव्हा परिसरातील २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिन सिंचनापासून वंचित आहे. यासाठी आमरण उपोषण, धरणे आंदोलन, पाणी दो या मौत दो व जलरामाधि सारखे अभिनव आंदोलने माजी समाज कल्याण सभापती जि.प. भंडारा चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी केले होते. अनेक वेळा सरकारने भरभरून आश्वासनही आंदोलनकर्त्यांना दिले होेते. परंतू अद्याप या झरी उपसा सिंचन योजनेला निधी उपलब्ध झाला नसल्या कारणाने ही योजना रखडली असून २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिन सिंचनापासून वंचित आहे.गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणातून पाणी कालव्याद्वारे झरी तलावात सोडून ते पाणी बारव्हा व दिघोरी परिसरातील एकूण २५ गावातील सुजलाम सुफलाम करणारी ही योजना मागील १० वर्षांपासून अखेरची घटका मोजत आहे. झरी तलाव हे मुर्झा गटग्रामपंचायत हद्दीत येते. भर पावसाळ्यातही हे तलाव हे मुर्झा गटग्रामपंचायतच्या हद्दीत येते. भर पावसाळ्यातही हे तलाव पाण्याने तुडूंब भरलेले असते. ही योजना पूर्ण झाल्यास पर्यटन स्थळाच्या यादीत पुन्हा एक स्थळ यादीत समाविष्ट होणार आहे. झरी तलाव हे १०.५० हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे. इटियाडोह धरणाचे १२.९४ दषलक्ष घनमीटर पाणी झरी उपसा सिंचनाकरीता पुरेषे आहे. या भागातील शेतकरी अजुनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षी शेतीतील उत्पन्न पावसाअभावी मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. आत्महत्याचे प्रमाण या भागात जास्त आहे. तर कर्जबाजारी शेतकरी व्याजाचे पैसे बँकामध्ये भरण्यासाठी शेती मातीमोल भावाने विकण्यासाठी काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी ही योजना सुरू करणे या योजनेकरीता शासनाने अनेकदा सर्वे केले. आस्वासनेही दिली. परंतू निधी उपलब्ध करून दिला नाही. २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिनामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील झरी, मुर्झा, मालदा, दिघोरी, सालेबर्डी, साखरा, तावशी, चिकना, जैतपूर, बारव्हा, चिचाळ, दहेगाव, मुरमाडी, कोदामेडी, पारडी व गोंदिया जिल्ह्यातील देवूळगाव, बोदरा या गावांचा समावेश आहे. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी १८ आॅक्टोंबर २००० ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तेव्हा नागपूर येथील हिवाळी अधिवेशात चर्चा करू व झरी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळून लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतू तसे झाले नाही.दि.१० डिसेंबर २००१ ला नागपूर हिवाळी अधिवेषनाच्या दरम्यान झरी तलावाच्या पाळीवर आमरण उपोषण व सामुहिक जलसमाधिचा इशारा दिला होता. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिस अहमद यांनी प्रत्येक्ष आंदोलन स्थळी येवून तीन महिन्याच्या आत ही योजना सुरू करू असे आश्वासन दिले होते. दि. २ मार्च २००६ ला मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले होते.साकोली आगाराची बसची तोडफोड करून आंदोलनाचे हिंसक वळन घेतले होते. दि.१४ नोव्हेंबर २००७ ला टेंभूर्णे यांना आंदोलनादरम्यान १३ दिवसांचा तुरूंगवासही भोगावा लागला.अखेर दि. १२ जानेवारी २०१० च्या पत्रानुसार कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग भंडाराकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात आले. दि.५ मे २०१० ला संबंधित विभागाकडून फेरनियोजनास शासनाची मान्यता करीता राज्यपालांनी निर्देश दिले. त्या आधारावर दि. १७ आॅगस्ट २०१० ला मंत्रालयातील पत्रानुसार वनविभाग व प्रकल्पाला मान्यता दिल्याचे पत्र पाठविण्यात आले. परंतू झरी उपसा सिंचन योजनेकरीता महाराष्ट्र शासनाने अद्याप निधी मंजूर केला नाही. त्यामुळे २ हजार ५१५ हेक्टर क्षेत्र अजूनही सिंचनापासून वंचित आहे. (तालुका प्रतिनिधी)