शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करु नये

By admin | Updated: February 7, 2015 00:21 IST

जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली व जप्ती करु नये, ...

भंडारा : जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली व जप्ती करु नये, यासाठी उपनिबंधकांनी सर्व बँकाना लेखी निर्देश द्यावेत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार व चरण वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे, निमंत्रित सदस्य आशा गायधने, भरत खंडाईत, अरविंद भालाधरे, संजय गाढवे उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ करिता सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदवासी उपयोजना क्षेत्रबाह्य या तीन विकास क्षेत्र मिळून १२२ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्याला मान्यता दिली. यामध्ये यंत्रणाकडून २३८ कोटी ९५ लाख रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून शासनाने ठरविलेल्या कमाल मर्यादेपेक्षा ११६ कोटी ३६ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा निधी समाजातील दुर्लक्षित आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे, कामाचे नियोजन करतांना पहिल्या तीन महिन्यात आराखडा तयार करुन उर्वरित कालावधीत त्याची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसोबत दरडोई उत्पन्न वाढेल अशा बाबींचा समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश त्यांनी दिले.सर्वसाधारण योजनेसाठी ७०.२७ कोटी सर्वसाधारण योजनेसाठी ७० कोटी २७ लाख, अनुसूचित जाती उपाययोजना २९ कोटी ४७ लाख आणि आदिवासी उपाययोजना १२ कोटी ८४ लाख रुपये निर्धारित केले आहेत. सर्वसाधारण योजनेंतर्गत १६७ कोटी ६४ लाख रुपयांचे प्रस्ताव कार्यवाही यंत्रणांकडून प्राप्त झाले. मात्र ७० कोटी २७ लाख रुपयांची मर्यादा असल्यामुळे ९९ कोटी ३७ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी आहे. अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये ३९ कोटी ४७ लाख रुपयांचा प्राप्त प्रस्ताव कमाल मर्यादेत असल्यामुळे सर्व प्रस्ताव मान्य करण्यात आले. आदिवासी उपयोजनामध्ये २९ कोटी ८३ लक्ष ४२ हजार रुपयांपैकी १२ कोटी ८४ लक्ष रुपयांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले असून १६ कोटी ९९ लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे.कृषी योजनेसाठी १०.६४ कोटीकृषी व सलग्नसेवा १० कोटी ६४ लक्ष ४७ हजार, ग्रामीण विकासासाठी विशेष कार्यक्रम ४ कोटी ३४ लाख २७ हजार, सामाजिक सेवा २९ कोटी ५२ लाख २६ हजार, ऊर्जा विकास १ कोटी, ग्रामीण व लघु उद्योग ५१ लाख ४० हजार, परिवहन १३ कोटी ९८ लाख ३९ हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण ३ कोटी १७ लाख १ हजार, सामान्य आर्थिक सेवा ३ कोटी ५८ लक्ष २० हजार, नाविन्यपूर्ण योजना २ कोटी ४६ लाख तसेच इतर योजनेत १ कोटी ५ लाख असा एकूण ७० कोटी २७ लाख रुपयांचा आराखडाला आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)