शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

पालांदूर : वीजबिल थकीतच्या कारणाने संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील गाव लाइन अर्थात, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू झाले ...

पालांदूर : वीजबिल थकीतच्या कारणाने संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील गाव लाइन अर्थात, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू झाले आहे, ते थांबवावे. थकीत असलेले बिल जिल्हा परिषद विभागाने भरावे. आतापर्यंत शासकीय धोरणाच्या अधीन राहून जिल्हा परिषद ने बिल भरलेले आहे. थकीत वीजबिलाचा कारण पुढे करीत गाव खेडी अंधारात टाकू नका, तोडलेली वीज पुन्हा जोडा, अशा अपेक्षेची निवेदन सरपंच संघटना तालुका लाखनीच्या वतीने अभियंता महावितरण, खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष म.वा. बोळणे, नरेंद्र भांडारकर, प्रशांत मासुरकर, सरपंच कल्पना सेलोकेर, सरपंच संगीता घोनमोडे, मनोहर बोरकर, जगदीश भोयर, विना नागलवाडे, देवनाथ निखाडे, सरपंच परसराम फेंडर, सुमेध मेश्राम, सरपंच रसिका कांबळे, सरपंच सुधाकर हटवार यासह लाखनी तालुक्यातील बहुसंख्येने सरपंच उपस्थित होते.

गावातील पथदिव्यांचे बिल नियमितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विभाग भरत आलेला आहे. गावच्या ग्रामपंचायतीची तिजोरी रिकामी असल्याने पथदिव्यांचे बिल भरणे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या बाहेर आहे. हे वास्तव अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. वास्तविक, तिचा आधार घेत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका गावखेड्यातील जनतेला बसू नये. शासन स्तरावर थकीत बिलाचा पुनर्विचार व्हावा. राज्यशासनाने सुद्धा यात मध्यस्थी करीत गावच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. अशा रास्त अपेक्षांचे निवेदन सरपंच संघटना तालुका लाखणी यांनी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

गावच्या ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीकरिता १५व्या वित्त आयोगातून गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून गावलाइन स्वयंभू करावी. १५वा वित्त आयोगाच्या पार्श्वभूमीवर गावात योग्य ते नियोजन करीत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीनेही अपेक्षित सहकार्याची अपेक्षा केली आहे.